शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्यांना शासनच कारणीभूत

By admin | Updated: September 25, 2015 01:24 IST

वाशिम येथील अन्नदाता प्रबोधन मंथन सभेतील सूर.

वाशिम : शेतकर्‍यांच्या मालाला भाव न देणे, त्याच्या अडचणी अग्रक्रमाने न सोडविणे, शासनाच्या योजनांचा योग्य लाभ न देणे व विविध योजनांमधील क्लिष्ट अटींमुळे शेतकरी खचला आहे. कोणत्याही योजनेचा लाभ शेतकर्‍याला घ्यायचा असल्यास किंवा नुकसान झाल्यास मिळणार्‍या मदतसाठी मदतीपेक्षा जास्त खर्च येतो याकडे शासनाचे लक्ष नसल्यानेच शेतकरी आत्महत्येच्या दारात पोहोचला असल्याचा २४ सप्टेंबर रोजी आयोजित सूर अन्नदाता प्रबोधन मंथनामध्ये दिसून आला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच उद्भवणार्‍या प्रतिकुल परिस्थितीपुढे बळीराजा हतबल झाला आहे. नैराश्येने ग्रासलेल्या अशाच काही शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा कटू निर्णय घेतला; मात्र किमान यापुढे तरी शेतकरी आत्महत्यांच्या घटनांना पायबंद लागून जगाच्या पोशिंद्याला सन्मानाने जगता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतिने ह्यअन्नदाता प्रबोधन मंथनह्ण सभेचे आयोजन २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याला रोख देण्यासाठी काय करायला पाहिजे यावरील काही मुददे प्रशासनाच्यावतीने काढून ते सभेत सांगण्यात आले. तसेच यावर शेतकरी, मान्यवरांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बहुतांश शेतकर्‍यांनी व उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या धोरणावर ठपका ठेवला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे, तहसीलदार आशिष बिजवल, आत्माचे प्रकल्प संचालक वाघमारे यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची रुपरेषा मान्यवरांनी व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमास उपस्थित शेतकर्‍यांनी व मान्यवरांनी आपल्या मते व्यक्त केलीत. यावेळी हरिभाऊ क्षीरसागर यांनी शासनाच्यावतिने कृती कार्यक्रम योग्य राबविल्या जात नाही. त्याकडे लक्ष दयावे, अशी मागणी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरणराव सरनाईक यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष नसल्याचा आरोप केला. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करुन दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. अवि मारशेटवार यांनी शासनाच्या धोरणावर ताशोरे ओढत जिल्हाधिकारी यांनी आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे शेतकर्‍यांविषयीची तळमळ असल्याचेही सांगितले. शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घ्यायच्या असतील तर यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात यावी व ते २४ तास उघडे ठेवण्यात यावे, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणताही शेतकरी असो त्याचे फाटके कपडे न पाहता त्याला प्रथम प्रवेश देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी नारायण विभुते यांनी शेतकर्‍यांच्या शेतमालावर अडतीत २ टक्के घेतात, असा आरोप केला. त्यावेळी सारडा नामक व्यापार्‍याने यानंतर मी शेतकर्‍यांकडून एक टक्काच अडत घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. एम. बी. इंगळे यांनी केले. कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी अभियानाचा उद्देश विषद केला. आभारप्रदर्शन तहसीलदार आशिष बिजवल यांनी केले.