शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावप्रशासन झाले कुलूपबंद!

By admin | Updated: July 14, 2014 23:33 IST

तालुक्यातील ९१ ग्रामपंचायचे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे

कारंजा : गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावचे विकास कामे ग्रामसेवकांच्या सहकार्याने पुर्ण होतात. मात्र तालुक्यातील ९१ ग्रामपंचायचे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे गावातील विविध विकास कामे थांबली आहे. त्याबरोबर नागरीकांना व शालेय विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात ९१ ग्रामपंचायती अतंर्गत १0३ गावे कार्यरत आहे. त्याकरीता ५५ ग्रामसेवक काम करतात. मात्र हे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे गावातील रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीचे सोय, जन्म मृत्यृ विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, गावातील बाजार स्वच्छता, कोंडवाडा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, नविन विकासात्मक योजना, नविन रोहयोच्या कामावर स्वाक्षरी, विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांंना मिळणारे दाखले आदी कामे रखडली आहे. त्यामुळे गावातील नागरीक व विद्याथ्र्यी तालुका स्तरावर असणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर चकरा माराव्या लागत आहे. ग्रामसेवक संपावर असल्यामुळे गावात दररोज होणारी टॅक्सची वसूली थांबली आहे. गावागावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रोगराई होउ नये म्हणुन होणारे फवारणीचे कामे थांबले आहेत. त्यामुळे रोगराई होण्याची भिती नाकारता येत नाही. तसेच प्रत्येक गावात पाण्यामध्ये ब्लिंचीग पावडर टाकल्या जात नाही. तर काही गावात कर्तव्यदक्ष असणारे शिफाई पाण्यामध्ये पावडर टाकण्याचे काम करीत आहे. पावसाळा असल्याने गावात स्वच्छता असणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामसेवकच नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.