शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार

By admin | Updated: June 9, 2014 01:51 IST

वाशिम जिल्हयात गारपीटग्रस्तांना ५४.४५ कोटीचे निधीवाटप; अनेक शेतकर्‍यांचे खातेक्रमांक अपाप्त

सनत आहाळे / वाशिमजिल्हयात फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे जिल्हयातील ५२९ गावांमधील हजारो शेतकर्‍यांचे विविध पिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानी दाखल राज्य शासनाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे ४कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांच्या निधीचे शेतकर्‍यांनी त्यांचे बॅक खाते क्रमांक न कळविल्याने वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची खाते क्रमांक लवकर न कळविल्यास सदर शिल्लक मदतनिस शासनात परत करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येण्याचे संकेत दिसत आहेत. सन २0१३ मध्ये पावसाळयात सुध्दा वारंवार अतवृष्टी झाल्याने सतत पाऊस पडल्याने पूर आले,पावसाळयात अतवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबिन, उडीद, मुग व अन्य खरिप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीतून स्वत:ला सावरत जिल्हयातील शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. रब्बीची पिके ऐन कापणीस येण्याच्या बेतात असतांना २३ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत जिल्हयात गावोगावी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमध्ये जिल्हाभरातील ५२९ गावांमधील हजारो हेक्टर शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण करुन राज्य शासास अहवाल पाठवला त्या अहवालानूसार राज्य शासनाने वाशिम जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून ५९ कोटी रुपयांचा निधी पाठवला. या निधीपैकी आतापर्यंत ५४ कोटी ९५ लाख ५७ हजार १0२ रुपयांचे वाटप जिल्हा प्रशासाने केले आहे. मात्र शेतकर्‍यांना वारंवार आवाहने करुनही शेतकर्‍यांनी त्यांचे बँक खातेक्रमांक कळविले नाहीत. त्यामुळे ४ कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांचा निधी अद्यापही वितरीत होऊ शकलेला नाही. तो लवकर वितरीत न झाल्यास या महिना अखेर शासनास परत केला जाण्याचे संकेत आहेत.