शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

खाते क्रमांकाअभावी चार कोटीचा निधी परत जाणार

By admin | Updated: June 9, 2014 01:51 IST

वाशिम जिल्हयात गारपीटग्रस्तांना ५४.४५ कोटीचे निधीवाटप; अनेक शेतकर्‍यांचे खातेक्रमांक अपाप्त

सनत आहाळे / वाशिमजिल्हयात फेब्रुवारी व मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे जिल्हयातील ५२९ गावांमधील हजारो शेतकर्‍यांचे विविध पिकांचे कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानी दाखल राज्य शासनाने जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे ४कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांच्या निधीचे शेतकर्‍यांनी त्यांचे बॅक खाते क्रमांक न कळविल्याने वाटप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची खाते क्रमांक लवकर न कळविल्यास सदर शिल्लक मदतनिस शासनात परत करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येण्याचे संकेत दिसत आहेत. सन २0१३ मध्ये पावसाळयात सुध्दा वारंवार अतवृष्टी झाल्याने सतत पाऊस पडल्याने पूर आले,पावसाळयात अतवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबिन, उडीद, मुग व अन्य खरिप पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीतून स्वत:ला सावरत जिल्हयातील शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. रब्बीची पिके ऐन कापणीस येण्याच्या बेतात असतांना २३ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत जिल्हयात गावोगावी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमध्ये जिल्हाभरातील ५२९ गावांमधील हजारो हेक्टर शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे सर्वेक्षण करुन राज्य शासास अहवाल पाठवला त्या अहवालानूसार राज्य शासनाने वाशिम जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून ५९ कोटी रुपयांचा निधी पाठवला. या निधीपैकी आतापर्यंत ५४ कोटी ९५ लाख ५७ हजार १0२ रुपयांचे वाटप जिल्हा प्रशासाने केले आहे. मात्र शेतकर्‍यांना वारंवार आवाहने करुनही शेतकर्‍यांनी त्यांचे बँक खातेक्रमांक कळविले नाहीत. त्यामुळे ४ कोटी ४ लाख ४२ हजार ८९८ रुपयांचा निधी अद्यापही वितरीत होऊ शकलेला नाही. तो लवकर वितरीत न झाल्यास या महिना अखेर शासनास परत केला जाण्याचे संकेत आहेत.