शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

चार मंडळांना पीक विम्याचा लाभच नाही!

By admin | Updated: June 20, 2016 02:07 IST

रिसोड पंचायत समिती पदाधिका-यांचे पालकमंत्र्यांना साकडे.

रिसोड (जि. वाशिम): तालुका दुष्काळग्रस्त आणि पैसेवारी ५0 पेक्षा कमी असतानाही रिसोड तालुक्यातील चार महसूल मंडळांना पीक विमा योजनेतून वगळण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर रिसोड पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी चर्चा करून चार मंडळांच्या पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली. रिसोड तालुक्यातील चार मंडळांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन पंचायत समिती उपसभापती महादेव ठाकरे व अन्य पदाधिकार्‍यांनी रिसोड तालुक्यातील चार मंडळांना पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. रिसोड तालुक्यात आठ मंडळ असून त्यापैकी भर जहागीर, वाकद, केनवड व गोवर्धन या चार मंडळांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. ज्या मंडळामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला, तोसुद्धा तुटपुंजा असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. वगळण्यात आलेल्या चार महसूल मंडळात बराच भाग डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखला जातो. या सर्व मंडळातील पैसेवारी ५0 पेक्षा कमी आहे. येथे दुष्काळी परिस्थिती असतानादेखील पीक विम्यापासून या मंडळातील शेतकर्‍यांना वंचित ठेवले असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. वगळण्यात आलेल्या चार मंडळाला तातडीने पीक विम्याचा लाभ मंजूर करावा आणि दोषी अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शासनाने शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी उपसभापती महादेव ठाकरे, पंचायत समिती सदस्य बंडू घुगे, कावेरी अवचार, अशोक नरवाडे आदींनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी दिले.