शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

चार मंडळांना पीक विम्याचा लाभच नाही!

By admin | Updated: June 20, 2016 02:07 IST

रिसोड पंचायत समिती पदाधिका-यांचे पालकमंत्र्यांना साकडे.

रिसोड (जि. वाशिम): तालुका दुष्काळग्रस्त आणि पैसेवारी ५0 पेक्षा कमी असतानाही रिसोड तालुक्यातील चार महसूल मंडळांना पीक विमा योजनेतून वगळण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर रिसोड पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी चर्चा करून चार मंडळांच्या पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली. रिसोड तालुक्यातील चार मंडळांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन पंचायत समिती उपसभापती महादेव ठाकरे व अन्य पदाधिकार्‍यांनी रिसोड तालुक्यातील चार मंडळांना पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. रिसोड तालुक्यात आठ मंडळ असून त्यापैकी भर जहागीर, वाकद, केनवड व गोवर्धन या चार मंडळांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. ज्या मंडळामध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला, तोसुद्धा तुटपुंजा असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. वगळण्यात आलेल्या चार महसूल मंडळात बराच भाग डोंगराळ व दुर्गम म्हणून ओळखला जातो. या सर्व मंडळातील पैसेवारी ५0 पेक्षा कमी आहे. येथे दुष्काळी परिस्थिती असतानादेखील पीक विम्यापासून या मंडळातील शेतकर्‍यांना वंचित ठेवले असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. वगळण्यात आलेल्या चार मंडळाला तातडीने पीक विम्याचा लाभ मंजूर करावा आणि दोषी अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शासनाने शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी उपसभापती महादेव ठाकरे, पंचायत समिती सदस्य बंडू घुगे, कावेरी अवचार, अशोक नरवाडे आदींनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी दिले.