शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांनी रात्र काढली अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:02 IST

आसोला खुर्द: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्दसह परिसरात १0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे पाच गावातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या गावांत तब्बल १७ तास वीजपुरवठा खंडित होता. 

ठळक मुद्दे१७ तास वीज खंडितमानोरा तालुक्यातील आसोला परिसरातील प्रकार

 लोकमत न्यूज नेटवर्कआसोला खुर्द: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्दसह परिसरात १0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे पाच गावातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. या गावांत तब्बल १७ तास वीजपुरवठा खंडित होता. सविस्तर असे की मौजे आसोला खुर्दसह परिसरात वादळ, वारा, पाऊस नसताना अचानक १0 ऑगस्ट  रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला काही वेळाने वीजपुरवठा सुरळीत होईल असे वाटत असताना; मात्र वीज पुन्हा आलीच नाही त्यामुळे रात्रभर विजेच्या लपंडावामुळे अतोनात नागरिकांना त्रास सहन कारवा लागला आसोला खुर्दसह परिसरातील हातोली आमदरी, शिवणी, वसंतनगर तांडा, आदी पाच गावाला रात्रभर खंडित वीजपुरवठय़ाचा फटका सहन करावा लागला. तब्बल १७ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा बंद राहिल्याने पाणीपुरवठा, पीठ गिरणी, टीव्ही, मोबाइल, पंखे, फ्रीज आदीसह विजेवर चालणारी सर्वच उपकरणे बंद पडल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. त्यातच दिवसभर राबराब राखून शेतात घाम गाळून आलेला शेतकरी सायंकाळी विश्रांती घेण्याच्या मन:स्थितीत असतो; परंतु सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे डासांसह उकाड्याच्या त्रासात रात्र जागून काढण्याची पाळी ग्रामस्थांवर आली आहे. वीजपुरवठय़ाअभावी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने वृद्ध व बालकांना  आजारांची लागण होत  असून वीज वितरण कंपनीच्या उदासीन कारभरापायी पाच गावांवर रात्रीच्या विजेच्या लपंडावाचा सामना करण्याची वेळ येत असल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांमध्ये  संतापाचे वातावरण आहे.  दरम्यान, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी संबंधित कर्मचारी आणि अभियंत्यांकडे चौकशी करून माहिती ुदेण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास त्यांच्याशी संपर्कही होत नाही. त्यामुळे वीज वितरणच्या संबंधित उपकेंद्रावरील लॅण्डलाइनवर संपर्क केल्यास लाइन व्यस्त असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही.  गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची दखल वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घ्यावी आणि संबंधित गावातील लाइनमनला मुख्यालयी राहण्याच्या सूचना कराव्यात, तसेच पाच गावांमधील वीजपुरवठा १७ तास खंडित राहिल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच संबंधित गावातील लोक करीत आहेत.

आसोलासह परिसरातील गावांत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कर्मचार्‍यांनी काही ठिकाणी पाहणीही केली; परंतु रात्रीच्या वेळी नेमका कोठे बिघाड झाला, हे कळणे कठीण झाले होते. परिसरातील सर्वच ठिकाणच्या रोहित्रासंह इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शोधू आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही. यासाठी उपाययोजना करू. - जे. एस. दामोदरसहायक अभियंता, मानोरा ग्रामीण २