शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाच महिन्यानंतर अखेर अशोक मंत्रीला अटक

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

मानोरा पोलिसांनी अशोक मंत्रीला घेतले ताब्यात; लाखो रूपयांचे सोयाबीन खरेदी प्रकरण.

मानोरा : मानोरा शहरातील व्यापारी अशोक मंत्री यांनी अनेक शेतकर्‍यांकडून धरोहरवर हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करून शेतकर्‍यांना पैसे न देता २९ डिसेंबर रोजी ते घरून निघून गेले होते. १ जानेवारी रोजी सुरेश मंत्री यांनी मानोरा पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती. तेव्हापासून गायब असलेल्या अशोक मंत्री यांना अखेर पाच महिन्यानंतर आज दि.३0 रोजी मसलापेन येथे अटक करण्यात आली. मूळचे शिरपूर जैन येथील रहिवासी असलेले अशोक मंत्री काही वर्षापुर्वी मानोरा येथे वास्तव्यास आले होते. येथे व्यापार करीत असताना शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करून अडत दुकान टाकून सोयाबीनची खरेदी सुरू केली. खरेदी केलेले सोयाबीन बुलडाणा अर्बन बँकेच्या मंगरूळपीर येथील वेअर हाऊसमध्ये तारण स्वरूपात ठेवून तेथून कोट्यवधी रूपयाची उचल केली.त्यानंतर ते २९ डिसेंबर २0१३ रोजी घरून निघून गेले. ते घरून निघून गेल्यामुळे ज्यांनी सोयाबीन विकले त्या शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला. त्यांचा भाऊ सुरेश द्वारकादास मंत्री याने १ जानेवारी २0१४ रोजी मानोरा पोलिसात आपला भाऊ अशोक मंत्री घरून निघून गेल्याची तक्रार दिली. त्यामुळे शेतकर्‍यात धास्ती निर्माण झाली. २८ जानेवारी २0१४ रोजी कोंडोली येथील शेतकरी विजय नानासाहेब देशमुख यांनी मानोरा पोलिसांना अशोक मंत्री, त्याचा भागीदार सतीश पुरणमल राठी व सुरेश द्वारकादास मंत्री यांच्याविरूद्ध तक्रार दिली. मानोरा पोलिसांनी त्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या ४२0,१२0 ब कलमानुसार गुन्हा नोंदवून सतीश राठी यांना २८ जानेवारीला तर सुरेश मंत्री यांना २९ जानेवारीला अटक केली. मात्र,अशोक मंत्री गेल्या पाच महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर आज ३0 रोजी अशोक मंत्री यांना वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी मसलापेन येथे अटक केली व मानोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना चौकशीसाठी कारंजा येथे एसडीपीओ यांच्याकडे नेण्यात आले. अशोक मंत्री यांनी सुमारे ४४ शेतकर्‍यांकडून धरोहरवर सोयाबीन घेतले. काही शेतकर्‍यांना धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश वटले नाहीत.