शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

तिसऱ्या लाटेची भीती; रुग्ण आढळताच एक शाळा पुन्हा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या ...

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या २७५ शाळांपैकी ८१ शाळा शुक्रवार ३० जुलैपर्यंत जि.प. शिक्षण विभागाने सुरू केल्या. शाळा सुरू करण्यात आल्यानंतर गावात पुन्हा कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामपंचायतींनी आवश्यक खबरदारी घेतली आहेच शिवाय शाळांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यासह विद्यार्थ्यांची तपासणी, बैठक व्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. तथापि, एवढी काळजी घेतल्यानंतरही मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथे एक नवा कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील शाळा शिक्षण विभागाला बंद करावी लागली.

----------------

१) जिल्ह्यात एकूण शाळा - २७५

सध्या सुरू असलेल्या शाळा - ८१

तालुका - सुरू असलेल्या शाळा - पुन्हा बंद केलेल्या शाळा

कारंजा - ३० - ००

मालेगाव - २२ - ००

मंगरुळ - ०७ - ००

मानोरा - ०५ - ०१

रिसोड - १२ - ००

वाशिम - १२ - ००

(तालुक्यांच्या संख्येनुसार यात बदल करावा)

२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?

वर्ग मुले - मुली - एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)

आठवी - २५० - २०१ - ४५१ - ३.१२

नववी - २७० - २१० - ४८० - ४.०५

दहावी - ३०१ - १८८ - ४८९ - ७.१५

अकरावी -०० - ००० - ००० - ०००

बारावी - २७७ - १८७ - ४६४ - ७.९२

३) पंधरा दिवसात एक शाळा बंद

कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावांत ग्रामपंचायतीने हमी घेतल्यानंतर आणि प्रस्ताव दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून ८१ शाळा सुरू करण्यात आल्या. ही प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, ३० जुलैपर्यंत ८१ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, या पंधरा दिवसांत केवळ एका गावात नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एक शाळा बंद करावी लागली.

४) विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत

कोट : शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेतही आवश्यक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची फारसी भीती नसून, नियमित शाळेत जाणे आम्हाला आता आवडत आहे.

-संकेत गायकवाड,

विद्यार्थी

------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच विद्यालय सुरू झाले. त्यामुळे मोठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसोबत विद्यालयात अभ्यास करण्याचा आनंद आता घेता येत असून, नेटवर्कअभावी अडथळे येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून सुटका झाली आहे. विद्यालयात आवश्यक काळजीही घेतली जात आहे.

- आदित्य इंगोले

----------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या. ही बाब चांगली आहे; परंतु कोरोना संसर्ग अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. शाळेत विद्यार्थ्यांची ंआवश्यक काळजी घेण्यात येत असली तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क वाढल्याने पाल्यास कोरोना संसर्ग होण्याची भीती असते.

- कैलास गायकवाड, पालक