शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची भीती; रुग्ण आढळताच एक शाळा पुन्हा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या ...

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या २७५ शाळांपैकी ८१ शाळा शुक्रवार ३० जुलैपर्यंत जि.प. शिक्षण विभागाने सुरू केल्या. शाळा सुरू करण्यात आल्यानंतर गावात पुन्हा कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामपंचायतींनी आवश्यक खबरदारी घेतली आहेच शिवाय शाळांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यासह विद्यार्थ्यांची तपासणी, बैठक व्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. तथापि, एवढी काळजी घेतल्यानंतरही मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथे एक नवा कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील शाळा शिक्षण विभागाला बंद करावी लागली.

----------------

१) जिल्ह्यात एकूण शाळा - २७५

सध्या सुरू असलेल्या शाळा - ८१

तालुका - सुरू असलेल्या शाळा - पुन्हा बंद केलेल्या शाळा

कारंजा - ३० - ००

मालेगाव - २२ - ००

मंगरुळ - ०७ - ००

मानोरा - ०५ - ०१

रिसोड - १२ - ००

वाशिम - १२ - ००

(तालुक्यांच्या संख्येनुसार यात बदल करावा)

२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?

वर्ग मुले - मुली - एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)

आठवी - २५० - २०१ - ४५१ - ३.१२

नववी - २७० - २१० - ४८० - ४.०५

दहावी - ३०१ - १८८ - ४८९ - ७.१५

अकरावी -०० - ००० - ००० - ०००

बारावी - २७७ - १८७ - ४६४ - ७.९२

३) पंधरा दिवसात एक शाळा बंद

कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावांत ग्रामपंचायतीने हमी घेतल्यानंतर आणि प्रस्ताव दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून ८१ शाळा सुरू करण्यात आल्या. ही प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, ३० जुलैपर्यंत ८१ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, या पंधरा दिवसांत केवळ एका गावात नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एक शाळा बंद करावी लागली.

४) विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत

कोट : शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेतही आवश्यक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची फारसी भीती नसून, नियमित शाळेत जाणे आम्हाला आता आवडत आहे.

-संकेत गायकवाड,

विद्यार्थी

------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच विद्यालय सुरू झाले. त्यामुळे मोठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसोबत विद्यालयात अभ्यास करण्याचा आनंद आता घेता येत असून, नेटवर्कअभावी अडथळे येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून सुटका झाली आहे. विद्यालयात आवश्यक काळजीही घेतली जात आहे.

- आदित्य इंगोले

----------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या. ही बाब चांगली आहे; परंतु कोरोना संसर्ग अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. शाळेत विद्यार्थ्यांची ंआवश्यक काळजी घेण्यात येत असली तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क वाढल्याने पाल्यास कोरोना संसर्ग होण्याची भीती असते.

- कैलास गायकवाड, पालक