शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची भीती; रुग्ण आढळताच एक शाळा पुन्हा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या ...

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या २७५ शाळांपैकी ८१ शाळा शुक्रवार ३० जुलैपर्यंत जि.प. शिक्षण विभागाने सुरू केल्या. शाळा सुरू करण्यात आल्यानंतर गावात पुन्हा कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामपंचायतींनी आवश्यक खबरदारी घेतली आहेच शिवाय शाळांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यासह विद्यार्थ्यांची तपासणी, बैठक व्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. तथापि, एवढी काळजी घेतल्यानंतरही मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथे एक नवा कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील शाळा शिक्षण विभागाला बंद करावी लागली.

----------------

१) जिल्ह्यात एकूण शाळा - २७५

सध्या सुरू असलेल्या शाळा - ८१

तालुका - सुरू असलेल्या शाळा - पुन्हा बंद केलेल्या शाळा

कारंजा - ३० - ००

मालेगाव - २२ - ००

मंगरुळ - ०७ - ००

मानोरा - ०५ - ०१

रिसोड - १२ - ००

वाशिम - १२ - ००

(तालुक्यांच्या संख्येनुसार यात बदल करावा)

२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?

वर्ग मुले - मुली - एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)

आठवी - २५० - २०१ - ४५१ - ३.१२

नववी - २७० - २१० - ४८० - ४.०५

दहावी - ३०१ - १८८ - ४८९ - ७.१५

अकरावी -०० - ००० - ००० - ०००

बारावी - २७७ - १८७ - ४६४ - ७.९२

३) पंधरा दिवसात एक शाळा बंद

कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावांत ग्रामपंचायतीने हमी घेतल्यानंतर आणि प्रस्ताव दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून ८१ शाळा सुरू करण्यात आल्या. ही प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, ३० जुलैपर्यंत ८१ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, या पंधरा दिवसांत केवळ एका गावात नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एक शाळा बंद करावी लागली.

४) विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत

कोट : शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेतही आवश्यक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची फारसी भीती नसून, नियमित शाळेत जाणे आम्हाला आता आवडत आहे.

-संकेत गायकवाड,

विद्यार्थी

------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच विद्यालय सुरू झाले. त्यामुळे मोठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसोबत विद्यालयात अभ्यास करण्याचा आनंद आता घेता येत असून, नेटवर्कअभावी अडथळे येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून सुटका झाली आहे. विद्यालयात आवश्यक काळजीही घेतली जात आहे.

- आदित्य इंगोले

----------

कोट : गेल्या दीड वर्षानंतर माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या. ही बाब चांगली आहे; परंतु कोरोना संसर्ग अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. शाळेत विद्यार्थ्यांची ंआवश्यक काळजी घेण्यात येत असली तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क वाढल्याने पाल्यास कोरोना संसर्ग होण्याची भीती असते.

- कैलास गायकवाड, पालक