शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात ३०२ शस्त्र परवाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

कोणासोबत काैटुंबिक अथवा वैयक्तिक वैर असेल आणि त्याच्यापासून जीवितास धोका असेल, तर वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या संकटातून स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्याकरिता ...

कोणासोबत काैटुंबिक अथवा वैयक्तिक वैर असेल आणि त्याच्यापासून जीवितास धोका असेल, तर वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या संकटातून स्वत:चा जीव सुरक्षित ठेवण्याकरिता जवळ शस्त्र बाळगण्याचा परवाना गिमातला जातो. यासह वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठीही शस्त्र परवाना दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये जवळ बंदूक असावी, केवळ याचसाठी फॅशन म्हणून शस्त्र परवाना मिळविला जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. कमरेला पिस्तूल असल्यास समाजात प्रतिष्ठा वाढते, असाही अनेकांचा समज झालेला आहे. त्यामुळे शस्त्र परवान्यांसाठी दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे. आतापर्यंत मिळालेल्या शस्त्र परवान्यांमध्येही राजकारणी, बिल्डर्स याच लोकांचा अधिक समावेश आहे. जिल्ह्यात ३०२ जणांकडे शस्त्र परवाने आणि शस्त्र असले तरी, या माध्यमातून गंभीर गुन्हा घडलेला नाही.

................

शस्त्र परवाना काढायचा कसा?

ज्या व्यक्तीस शस्त्र परवाना काढायचा आहे, त्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलीस पाटील, तलाठी दाखला अर्जासोबत जोडावा लागतो. पोलिसांकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. जिल्हाधिकारी सुनावणी घेतात. खात्री झाल्यानंतरच परवाना दिला जातो.

................

वाशिममध्ये सर्वात जास्त; मानोऱ्यात सर्वात कमी

वाशिम तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवाने देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वाशिम शहरात ५० पेक्षा अधिक परवाने आहेत. आणखी परवाने मिळण्यासाठी जिल्ह्यातून अर्ज दाखल होत आहेत. त्या तुलनेत मानोरा तालुक्यात केवळ १० परवाने आहेत; परंतु वाशिम शहर परवाना घेण्यासाठी सर्वात पुढे आहे. यात राजकीय आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.

....................

नियम कडक करण्याची आवश्यकता

शस्त्र परवाना मिळविण्याची प्रक्रिया तुलनेने अधिक किचकट आहे; मात्र फॅशन म्हणून शस्त्र परवाने जवळ बाळगले जात असून नियम आणखी कडक करणे गरजेचे आहे.

अत्यावश्यकता असेल त्यालाच शस्त्र परवाना मिळायला हवा; मात्र, अनेकजण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, त्यावर जरब बसायला हवी.

....................

शस्त्र सांभाळणे कठीण

अनेकवेळा घर अथवा बाहेर क्षुल्लक कारणावरून वाद होतात. सामोपचाराने ते मिटविता येतात; मात्र अशाप्रसंगी रागाच्या भरात परवाना मिळालेल्यांकडून शस्त्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शस्त्र सांभाळणे कठीणच आहे.

जिल्ह्यात परवाना असलेल्या शस्त्राद्वारे आतापर्यंत एकही अनुचित घटना घडलेली नाही.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली असून ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

...................

सात वर्षांत वाढले शस्त्र परवाने

जिल्ह्यात पूर्वी मोजक्याच लोकांकडे शस्त्र परवाना असायचा; मात्र सात वर्षांत ही संख्या वाढलेली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३०२ लोकांकडे शस्त्र परवाना आहे. त्यातील अनेकांकडे पिस्तूल आहे; मात्र यामुळे अद्याप कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.

.................

१) जिल्ह्यातील एकूण शस्त्र परवाने - ३०२

वाशिम - १०३

रिसोड - ६३

मालेगाव - ३२

मंगरूळपीर - ४०

कारंजा - ५४

मानोरा - १०