शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By admin | Updated: April 26, 2017 01:09 IST

वाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.

‘धरणाचे पाणी अडवा’: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणीवाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. धरणाचे काम त्वरित पूर्ण करुन धरणाचे पाणी अडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह शिरपूर, मिर्झापूर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर २५ एप्रिल रोजी धडक देवून मागणी केली आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.लघु पाटबंधारे मिर्झापूर प्रकल्प गत १४ वर्षांपासून प्रलंबित पडला आहे. केवळ एक ते दोन दिवसात होणारे कामच शिल्लक असतांना याकडे संबधितांकडून दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या नियमानुसार अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार सदर काम ३ वर्षामये पूर्ण होणे अपेक्षित असतांना आज रोजी हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागा वाळणे, पिण्यासाठी गुरांना भटकंती करावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास शासनाच्या पैशातही वाढ होत आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. सदर प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास यावर्षी येणाऱ्या पावसाळयामध्ये त्या पाण्याचा योग्य वापर होवू शकते. तरी याकडे लक्ष देवून सदर प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून केली. यावेळी गणेश पा. ईरतकर, गजानन निंबाजी गाभणे, रामेश्रर निवृत्ती इरतकर, ओमकार चोपडे, सिताराम बोबडे, सुरेशभाऊ वाळले, गजानन कुटे, दिलीप बाविस्कर, रमेश मंत्री, राजु मंत्री, सुभाष सोमटकर, गजानन भांदुर्गे, सोनु देशमुख, राजु राऊत, संतोष राऊत, सुभाष इरतकर, श्रीराम मोरे, तेजराव सोमटकर, भागवत सोमटकर, रामकिसन सोमटकर, गजानन काळे, ज्ञानेश्वर गावंडे, बंडु मंत्री यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश होता.मिर्झापूर प्रकल्पाच्या कामाबाबत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी वारंवार चर्चा करुनही यश न आल्याने अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह धडक देवून सदर प्रश्न प्रशासनाच्या दरबारी आणले आहे. हे काम त्वरित पूर्ण न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांसह येवून ठिय्या आंदोलन केल्या जाणार आहे. -गणेश इरतकर, शेतकरी, शिरपूर जैन