शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासन गप्प!

By admin | Updated: April 25, 2017 01:50 IST

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोमवारी चकरा मारूनही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परत जावे लागले.२४ एप्रिल रोजी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पार्डीटकमोर येथे पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी बँकेत गेले होते. रक्कम नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शेतकऱ्यांना किसान क्रेडिटद्वारे पीक कर्ज वाटप करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एटीएममधून पैसे निघत नाहीत. तसेच एटीएममधून ट्रान्सफर केलेल्या बचत खात्यामधूनसुद्धा रोख रक्कम बँकेमधून मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करीत असले, तरी सर्व शेतकऱ्यांना सर्वच व्यवहार कॅशलेसमध्ये करणे शक्य होत नाही आणि रोख रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २ लाख रुपये पीक कर्ज घेतले, तेवढी रक्कम एटीएममधून किंवा विड्रॉल स्लीपने एक महिन्यातही निघत नाही. त्याकरिता एक महिना बँकेत चकरा माराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याकरिता लागणारा प्रवास खर्च, बुडणारी मजुरी, शारीरिक आणि मानसिक त्रास आदी बाबींचे कुणाला काही सोयरसुतक आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्याजवळून एक महिन्यासाठी खासगी कर्ज काढून पीक कर्ज भरले. त्यांचे पैसे परत करण्याकरिता आता पैसे नसल्याने व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसणार आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.दोन दिवसांपासून बँक बंद असल्यामुळे कॅश आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कॅश देऊ शकलो नाही. - सुुनील चौधरी, शाखाधिकारी, दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पार्डीटकमोर