शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासन गप्प!

By admin | Updated: April 25, 2017 01:50 IST

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोमवारी चकरा मारूनही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परत जावे लागले.२४ एप्रिल रोजी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पार्डीटकमोर येथे पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी बँकेत गेले होते. रक्कम नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शेतकऱ्यांना किसान क्रेडिटद्वारे पीक कर्ज वाटप करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एटीएममधून पैसे निघत नाहीत. तसेच एटीएममधून ट्रान्सफर केलेल्या बचत खात्यामधूनसुद्धा रोख रक्कम बँकेमधून मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत. शासन कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करीत असले, तरी सर्व शेतकऱ्यांना सर्वच व्यवहार कॅशलेसमध्ये करणे शक्य होत नाही आणि रोख रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २ लाख रुपये पीक कर्ज घेतले, तेवढी रक्कम एटीएममधून किंवा विड्रॉल स्लीपने एक महिन्यातही निघत नाही. त्याकरिता एक महिना बँकेत चकरा माराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याकरिता लागणारा प्रवास खर्च, बुडणारी मजुरी, शारीरिक आणि मानसिक त्रास आदी बाबींचे कुणाला काही सोयरसुतक आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्याजवळून एक महिन्यासाठी खासगी कर्ज काढून पीक कर्ज भरले. त्यांचे पैसे परत करण्याकरिता आता पैसे नसल्याने व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसणार आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.दोन दिवसांपासून बँक बंद असल्यामुळे कॅश आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कॅश देऊ शकलो नाही. - सुुनील चौधरी, शाखाधिकारी, दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पार्डीटकमोर