शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

काजळेश्वर परिसरातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:20 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात अती पावसाने काढणीला आलेला मुंग, उडीद, सोयाबीन आदि पिके सडली. काजळेश्वरसह उकर्डा, पानगव्हाण, उजळेश्वर, पलाना, खांदला, ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात अती पावसाने काढणीला आलेला मुंग, उडीद, सोयाबीन आदि पिके सडली. काजळेश्वरसह उकर्डा, पानगव्हाण, उजळेश्वर, पलाना, खांदला, विराहीत, जानोरी, धानोरा, पारवा, महागाव आदि गावांतील हजारो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. या शेतकऱ्यांनी मुंग, उडीद, सोयाबीनसह इतर पिकांचा विमाही काढला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानापोटी त्यांना विमा भरपाई मिळणे अपेक्षित होते. यासाठी त्यांनी पीकविमा कंपनीकडे रितसर अर्जही केले; परंतु प्रत्यक्ष पाहणी करूनही जानेवारी महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन उपाध्ये यांनी दिला आहे.

---

कोट: पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून गाजावाजा केल्या जाते. लाखो शेतकरी या आवाहनाला प्रतिसाद देत कोट्यवधी रुपये भरून पिकांना विमा कवच देतात; परंतु प्रत्यक्ष नुकसान होऊनही पीकविमा कंपन्या हात आवरत असतील, तर शेतकऱ्यांना लुटण्याचा हा व्यवसाय तर नाही ना, अशी शंका येत आहे. काजळेश्वर परिसरातील पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मुंग उडीद कापूस या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही त्यांना कवडीचाही विमा मिळाला नाही. याची दखल तातडीने घ्यावी.

-नितीन उपाध्ये, शेतकरी काजळेश्वर