शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

By admin | Updated: January 12, 2016 02:01 IST

८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने रब्बी सिंचनात व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम : शेती सिंचनाचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना महावितरणकडून दिरंगाईचा ह्यशॉकह्ण बसत आहे. कोटेशन भरूनही जिल्ह्यातील आठ हजार ८00 शेतकर्‍यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नसल्याने सिंचनापासून वंचित राहावे लागले. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यातूनच शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विहीर, शेततळे, तलाव, सिंचन प्रकल्प आदींच्या माध्यमातून शेतात पाणी आणण्यासाठी कृषीपंप जोडणी आवश्यक आहे. डिसेंबर २0१५ अखेर जिल्ह्यात ४७ हजार ९९८ कृषीपंप जोडण्या असल्याची नोंद महावितरणच्या वाशिम शाखेच्या दप्तरी आहे. गत पाच वर्षांत १६ हजार ८४३ शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी आवश्यक त्या शुल्काचा (कोटेशन) भरणा महावितरणकडे केला. यापैकी आठ हजार ७६ कृषीपंप जोडण्या दिल्या असून, उर्वरित आठ हजार ८00 जोडण्या प्रलंबित आहेत. पाणी असूनही केवळ वीजजोडणी नसल्याने शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंग पावत आहे. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला जऊळका येथील दत्ता लांडगे या शेतकर्‍याने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची चिरफाड करून मृत्यूला कवटाळले होते. कृषीपंप जोडणीस विलंब होत असल्याचा मुद्दा दत्ताने निदर्शनात आणून दिला होता. शेतकरी आत्महत्येनंतरही प्रलंबित असलेल्या कृषीपंप जोडणीचा प्रश्न लालफितशाहीतच अडकून असल्याचे दिसून येते. ८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने या शेतकर्‍यांना सिंचन करणे अशक्य झाले.