शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

By admin | Updated: January 12, 2016 02:01 IST

८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने रब्बी सिंचनात व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम : शेती सिंचनाचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना महावितरणकडून दिरंगाईचा ह्यशॉकह्ण बसत आहे. कोटेशन भरूनही जिल्ह्यातील आठ हजार ८00 शेतकर्‍यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नसल्याने सिंचनापासून वंचित राहावे लागले. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यातूनच शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विहीर, शेततळे, तलाव, सिंचन प्रकल्प आदींच्या माध्यमातून शेतात पाणी आणण्यासाठी कृषीपंप जोडणी आवश्यक आहे. डिसेंबर २0१५ अखेर जिल्ह्यात ४७ हजार ९९८ कृषीपंप जोडण्या असल्याची नोंद महावितरणच्या वाशिम शाखेच्या दप्तरी आहे. गत पाच वर्षांत १६ हजार ८४३ शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी आवश्यक त्या शुल्काचा (कोटेशन) भरणा महावितरणकडे केला. यापैकी आठ हजार ७६ कृषीपंप जोडण्या दिल्या असून, उर्वरित आठ हजार ८00 जोडण्या प्रलंबित आहेत. पाणी असूनही केवळ वीजजोडणी नसल्याने शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंग पावत आहे. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला जऊळका येथील दत्ता लांडगे या शेतकर्‍याने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची चिरफाड करून मृत्यूला कवटाळले होते. कृषीपंप जोडणीस विलंब होत असल्याचा मुद्दा दत्ताने निदर्शनात आणून दिला होता. शेतकरी आत्महत्येनंतरही प्रलंबित असलेल्या कृषीपंप जोडणीचा प्रश्न लालफितशाहीतच अडकून असल्याचे दिसून येते. ८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने या शेतकर्‍यांना सिंचन करणे अशक्य झाले.