शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

कोटेशन भरूनही शेतक-यांना कृषीपंप जोडणी मिळेना!

By admin | Updated: January 12, 2016 02:01 IST

८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने रब्बी सिंचनात व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम : शेती सिंचनाचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांना महावितरणकडून दिरंगाईचा ह्यशॉकह्ण बसत आहे. कोटेशन भरूनही जिल्ह्यातील आठ हजार ८00 शेतकर्‍यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नसल्याने सिंचनापासून वंचित राहावे लागले. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन बरेच शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. यातूनच शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विहीर, शेततळे, तलाव, सिंचन प्रकल्प आदींच्या माध्यमातून शेतात पाणी आणण्यासाठी कृषीपंप जोडणी आवश्यक आहे. डिसेंबर २0१५ अखेर जिल्ह्यात ४७ हजार ९९८ कृषीपंप जोडण्या असल्याची नोंद महावितरणच्या वाशिम शाखेच्या दप्तरी आहे. गत पाच वर्षांत १६ हजार ८४३ शेतकर्‍यांनी कृषीपंप जोडणीसाठी आवश्यक त्या शुल्काचा (कोटेशन) भरणा महावितरणकडे केला. यापैकी आठ हजार ७६ कृषीपंप जोडण्या दिल्या असून, उर्वरित आठ हजार ८00 जोडण्या प्रलंबित आहेत. पाणी असूनही केवळ वीजजोडणी नसल्याने शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंग पावत आहे. २0१५ मध्ये पोळा सणाच्या पूर्वसंध्येला जऊळका येथील दत्ता लांडगे या शेतकर्‍याने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची चिरफाड करून मृत्यूला कवटाळले होते. कृषीपंप जोडणीस विलंब होत असल्याचा मुद्दा दत्ताने निदर्शनात आणून दिला होता. शेतकरी आत्महत्येनंतरही प्रलंबित असलेल्या कृषीपंप जोडणीचा प्रश्न लालफितशाहीतच अडकून असल्याचे दिसून येते. ८८00 कृषीपंप जोडण्या प्रलंबित असल्याने या शेतकर्‍यांना सिंचन करणे अशक्य झाले.