शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

शेतकऱ्यांनो सावधान ! तुरीच्या गंजीत विषारी सापांचा तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST

वाशिम : ढगाळ वातावरणामुळे तुरीची कापणी करून शेतकऱ्यांनी तुरीच्या गंज्या लावून ठेवल्या आहेत. या गंज्यात विषारी साप आढळून ...

वाशिम : ढगाळ वातावरणामुळे तुरीची कापणी करून शेतकऱ्यांनी तुरीच्या गंज्या लावून ठेवल्या आहेत. या गंज्यात विषारी साप आढळून येत आहेत. खाद्याचा शोध आणि वातावरणातील बदलामुळे विषारी साप तुरीच्या गंजीत तळ ठोकत असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सर्पमित्र आणि वन्यजीव संघटनांकडून केले जात आहे.

खरीप हंगामातील विविध पिकांची कापणी करून शेतकरी सवडीनुसार त्या काढण्यासाठी या पिकांच्या गंज्या शेतात लावून ठेवतात किंवा कापणी केलेले पीक पूर्णपणे सुकण्याची प्रतीक्षा करतात. त्यातील पिकाची काढणी करण्यासाठी कधी शेतकऱ्यांना मळणी यंत्र मिळत नाही, तर कधी वातावरणाची साथ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा या गंज्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळ जागेवरच असतात. अशा गंज्यात सरपटणारे जीव तळ ठोकतात. त्यात प्रामुख्याने नाग आणि घोणस या विषारी सापांचा समावेश असतो. हे साप आपले खाद्य शोधण्यासह वातावरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पिकांच्या गंज्यात शिरतात. सहसा साप एकाच ठिकाणी थांबत नसले तरी ते खाद्याच्या शोधात अशा गंजीकडे परत येण्याची शक्यता अधिक असते. या गंजीत आढळणारे किडे, उंदीर, बेडूक आदी प्राणी सापांना गंजीकडे आकर्षित करतात. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे खोळंबलेल्या तूर काढणीला वेग आला असून, अनेक ठिकाणी तुरीच्या गंजीत विषारी साप आढळून येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी तुरीची गंजी काढताना लांब काठीचा आधार घेण्यासह इतर दक्षता बाळगावी, असे आवाहन मंगरूळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सदस्य आणि सर्पमित्रांनी केले आहे.

----------

साप शेतकऱ्यांचा मित्रच, त्याला मारू नका !

पिकांच्या गंजीत विविध जातीचे साप वारंवार आढळून येतात. बरेचदा शेतकरी हा साप हुसकावून लावण्याऐवजी किंवा सर्पमित्रांचा आधार घेऊन त्याला अधिवासात सोडण्याऐवजी भीतीपोटी त्याला मारतात. प्रत्यक्षात ही कृती शेतकऱ्यांचेच नुकसान करणारी आहे, कारण शिवारात वावरणारे साप पिकांसाठी घातक असलेले उंदिर आणि इतर कीटक खाऊन आपली उपजीविका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण होते, शिवाय जैवविविधता राखली जाते. त्यामुळेही शेतकऱ्यांना फायदाच होत असल्याने साप हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सापाला न मारता, सर्पमित्रांना कल्पना देऊन त्यांचा जीव वाचवावा, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे.

===Photopath===

110121\11wsm_1_11012021_35.jpg

===Caption===

 तुरीच्या गंजीत विषारी सापांचा तळ