शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

शेतक-यांचे लक्ष आता रब्बी पिकांच्या पेरणीवर!

By admin | Updated: September 7, 2015 00:13 IST

सरासरी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम; शेतक-यांचे लक्ष आता रब्बी पिकांकडे.

अकोला : पश्‍चिम विदर्भात यावर्षी सरासरी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी पिकांकडे लागले आहे. पण, रब्बी पिकासाठीही परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याने परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी हंगामातील पेरणी घटण्याची शक्यता आहे. २0१३-१४ मध्ये पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी ८ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पण २0१४-१५ मध्ये पावसाने दडी मारल्याने रब्बी पिकांची पेरणी कमी म्हणजे ३0 ते ४0 टक्के क्षेत्रावरच केली होती. यावर्षी पुन्हा पावसाचा खंड पडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील स्थिती वाईट असल्याने शेतकर्‍यांनी रब्बीचे नियोजन सुरू केले असले तरी डोळे मात्र परतीच्या दमदार पावसाकडे लागलेले आहेत. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यंदा पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाल्यांचे पाणी संपूर्ण हंगामात पुरेल याची शाश्‍वती नसल्याने ओलिताचा गहू व इतर पिकांना पावसाची गरज आहे.

रब्बीचे स्वप्न

         पाऊस नसल्याने खरिपातील सर्वच पिकांनी माना टाकल्या आहे. परिपक्वतेला आलेले पीक काळवंडले आहे. असे असले तरी आशादायी शेतकरी रब्बी पिकाचे स्वप्न बघत आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी खरिपात शेती कोरडी ठेवली होती. यावर्षी पश्‍चिम विदर्भातील १0 टक्केच्यावर शेतकर्‍यांनी खरिपात पेरणी केलेली नाही, त्या सर्व शेतकर्‍यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे.