शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - ...

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - तरूणींचे विवाह जुळविताना अडचणी निर्माण होत आहेत. विवाह जुळविणाऱ्या वर-वधू सुचक मंडळांकडे मध्यस्थांमार्फत विशेषत: तरुणांचे ‘बायोडाटा’ जमा होत आहेत. मात्र, विवाहोत्सुक मुलींसह त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा वाढल्याने त्यांना हवा तसा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांना तर हल्ली ‘डिमांड’च नसल्याची एकंदरित स्थिती आहे. मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असल्यास तिला शक्यतो पुणे, मुंबईत गलेलठ्ठ नोकरी असलेलाच नवरा हवा आहे; तर डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली व त्यांचे पालक डॉक्टरच शोधत आहेत. शासकीय, निमशासकीय नोकरी करणाऱ्यांनाही यामुळे विवाह जुळविताना अडचण निर्माण झालेली आहे.

...........

सर्वाधिक मागणी डॉक्टर, अभियंत्यांना

गेल्या काही वर्षांत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच पालकांकडून खुली सूट मिळत असल्याने बहुतांश मुलींनी परगावी जाऊन डॉक्टर, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

त्यापैकी ज्या मुलींचे विवाहाचे वय झाले, त्यांच्यासाठी वराचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, डॉक्टर किंवा अभियंताच आणि तोदेखील चांगल्या पॅकेजचा, अशी अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी, शेतमजूरच नव्हे; तर शासकीय व निमशासकीय नोकरी करीत असलेल्या विवाहोत्सुक वराला डॉक्टर किंवा अभियंता मुलगी मिळणे पूर्णत: अशक्यच झालेले आहे.

..........

अटी मान्य असतील तरच बोला...

पूर्वी वधू मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे संपूर्ण अधिकार पालकांनाच असायचे. पालक म्हणतील त्या मुलासोबत मुलीला विवाह करावा लागत असे. विशेषत: घरी शेती किती आहे आणि ती ओलिताखालची आहे किंवा कोरडवाहू, हे पाहिले जायचे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. शक्यतो शेतकरी नवरा कुणालाच नको आहे. काही मुलींकडून तर एकत्रित कुटुंबही नको आहे. मुलगा मुंबई, पुण्यात राहायला हवा. अशा अटी मान्य असतील तरच पुढची बोलणी होत असल्याचेही प्रकार घडत आहेत.

..........

मराठा समाजातील विवाहोत्सुक वर-वधूंचे विवाह जुळवून देण्याकरिता अपेक्षित सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुलांच्या तुलनेत आता मुलींकडून ‘डिमांड’ ठेवल्या जात आहेत. विवाह नाही जुळला तरी चालेल. पण अटी पूर्ण व्हायलाच हव्या, असाही अट्टहास वधुपित्यांकडून धरला जातो.

- राजेश दहातोंडे, कारंजा

........

ब्राह्मण समाजात उच्च शिक्षित मुलींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेले आहे. त्यांना त्यांच्याप्रमाणेच शिकलेला व चांगल्या पगाराच्या नोकरीवर असलेलाच नवरा हवा आहे. त्यात गैर नाही. मात्र, यामुळे कमी शिकलेल्या व साधी नोकरी असलेल्या मुलांचे विवाह जुळणे अशक्य झाले आहे.

- श्याम संघवई, वाशिम

..........

विरशैव लिंगायत समाजातही विवाह जुळविण्याचा प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे. अधिकांश मुलींना शासकीय नोकरीत चांगला पगार असलेलाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे. यामुळे कमी शिकलेली व शेतकरी असलेली मुले प्रतीक्षेत आहेत. ही परिस्थिती सध्यातरी बदलणार नसल्याचे दिसून येत आहे.

- का. शि. लाव्हरे, वाशिम