शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:42 IST

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - ...

दरवर्षी साधारणपणे जानेवारी महिन्यापासूनच विवाह जुळविण्याच्या कामास सुरूवात होते. तशी ती यंदाही झालेली आहे. मात्र, अनेक उपवल तरूण - तरूणींचे विवाह जुळविताना अडचणी निर्माण होत आहेत. विवाह जुळविणाऱ्या वर-वधू सुचक मंडळांकडे मध्यस्थांमार्फत विशेषत: तरुणांचे ‘बायोडाटा’ जमा होत आहेत. मात्र, विवाहोत्सुक मुलींसह त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा वाढल्याने त्यांना हवा तसा जोडीदार मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांना तर हल्ली ‘डिमांड’च नसल्याची एकंदरित स्थिती आहे. मुलीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असल्यास तिला शक्यतो पुणे, मुंबईत गलेलठ्ठ नोकरी असलेलाच नवरा हवा आहे; तर डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मुली व त्यांचे पालक डॉक्टरच शोधत आहेत. शासकीय, निमशासकीय नोकरी करणाऱ्यांनाही यामुळे विवाह जुळविताना अडचण निर्माण झालेली आहे.

...........

सर्वाधिक मागणी डॉक्टर, अभियंत्यांना

गेल्या काही वर्षांत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच पालकांकडून खुली सूट मिळत असल्याने बहुतांश मुलींनी परगावी जाऊन डॉक्टर, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

त्यापैकी ज्या मुलींचे विवाहाचे वय झाले, त्यांच्यासाठी वराचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, डॉक्टर किंवा अभियंताच आणि तोदेखील चांगल्या पॅकेजचा, अशी अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी, शेतमजूरच नव्हे; तर शासकीय व निमशासकीय नोकरी करीत असलेल्या विवाहोत्सुक वराला डॉक्टर किंवा अभियंता मुलगी मिळणे पूर्णत: अशक्यच झालेले आहे.

..........

अटी मान्य असतील तरच बोला...

पूर्वी वधू मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे संपूर्ण अधिकार पालकांनाच असायचे. पालक म्हणतील त्या मुलासोबत मुलीला विवाह करावा लागत असे. विशेषत: घरी शेती किती आहे आणि ती ओलिताखालची आहे किंवा कोरडवाहू, हे पाहिले जायचे. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. शक्यतो शेतकरी नवरा कुणालाच नको आहे. काही मुलींकडून तर एकत्रित कुटुंबही नको आहे. मुलगा मुंबई, पुण्यात राहायला हवा. अशा अटी मान्य असतील तरच पुढची बोलणी होत असल्याचेही प्रकार घडत आहेत.

..........

मराठा समाजातील विवाहोत्सुक वर-वधूंचे विवाह जुळवून देण्याकरिता अपेक्षित सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुलांच्या तुलनेत आता मुलींकडून ‘डिमांड’ ठेवल्या जात आहेत. विवाह नाही जुळला तरी चालेल. पण अटी पूर्ण व्हायलाच हव्या, असाही अट्टहास वधुपित्यांकडून धरला जातो.

- राजेश दहातोंडे, कारंजा

........

ब्राह्मण समाजात उच्च शिक्षित मुलींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेले आहे. त्यांना त्यांच्याप्रमाणेच शिकलेला व चांगल्या पगाराच्या नोकरीवर असलेलाच नवरा हवा आहे. त्यात गैर नाही. मात्र, यामुळे कमी शिकलेल्या व साधी नोकरी असलेल्या मुलांचे विवाह जुळणे अशक्य झाले आहे.

- श्याम संघवई, वाशिम

..........

विरशैव लिंगायत समाजातही विवाह जुळविण्याचा प्रश्न सध्या गंभीर झालेला आहे. अधिकांश मुलींना शासकीय नोकरीत चांगला पगार असलेलाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे. यामुळे कमी शिकलेली व शेतकरी असलेली मुले प्रतीक्षेत आहेत. ही परिस्थिती सध्यातरी बदलणार नसल्याचे दिसून येत आहे.

- का. शि. लाव्हरे, वाशिम