शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

विजयी उमेदवारांची सरपंचपदासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST

मालेगाव तालुक्यातील काही गावात अपक्ष उमेदवार निवडून आले असून, या उमेदवांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे . आपल्याकडे एकहाती ...

मालेगाव तालुक्यातील काही गावात अपक्ष उमेदवार निवडून आले असून, या उमेदवांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे . आपल्याकडे एकहाती सत्ता राहावी, यासाठी गावपुढारी या अपक्ष उमेदवारांचे मतपरिवर्तन करण्याच्या तयारीत आहेत . सरपंचपदासाठी सट्टाबाजार होत असल्याने आणि बोगस आदिवासींचे दाखले जोडल्या जात असल्याने शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीपूर्वी आरक्षण काढल्याने सरपंचपदाच्या आरक्षित जागेवर जोर लावून गावागावात संघर्ष होत होता. यावेळेस आरक्षण नसल्याने सर्वच जागा खेळीमेळीच्या वातावरणात लढल्या गेल्या. आता संख्याबळ स्पष्ट झाल्याने सरपंचपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी गाव पॅनलने बहुमत मिळविले असले तरी सरपंचपदासाठी आरक्षणातील उमेदवार नसल्यास बहुमत असूनही सरपंचपद विरोधकांकडे जाण्याची भीती सर्वांना आहे. आरक्षण सोडतीनंतर हालचाली गतिमान होणार आहेत. सरपंच कोणाचा, हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार असले तरी मालेगाव तालुक्यात फोडाफोडीचे राजकारण आतापासूनच जोर धरू लागले आहे.

--------

अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ

अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ

पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत पैसा वापरला जात नव्हता, परंतु वित्त आयोगानुसार विकासकामाचा सरळ पैसा ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने आणि हा निधी मोठा असल्याने सरपंच बनण्यासाठी पैसे देऊन सदस्य खरेदीचा व्यवहार होणार आहे. आता पॅनलकडून निवडून आलेले सदस्य आर्थिक लाभापोटी आणि पद मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे अपक्षांच्या ओढाओढीचा खेळ गावोगावी रंगणार आहे.

---------------

सरपंचासाठी फोडाफोडीचे राजकारण

ग्रामपंचायतीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही सर्वच पक्षांकडून सर्वांत जास्त आमची सत्ता आल्याचे दावे केल्या जात आहे. अनेक तालुका पुढाऱ्यांना गावात दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तरी तुम्ही सरपंचपद निवडीच्या वेळेस बघा, सरपंच आमचाच होणार असल्याचा दावा केला जात आहे. यावरून सरपंचपदाचे आरक्षण निघाल्यानंतर सर्व ग्रामपंचायतींत मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होणार आहे.