शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक पिकांत आंतरपिक घेणारे गाव ‘टो’

By admin | Updated: February 8, 2017 12:55 IST

प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ गावाचा समावेश आहे.

फळबागेही आंतरपिक : शेतकऱ्यांच्या प्रयोगाला प्रशासनाचाही पुरस्कारनंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. ८ - जिल्हयात अनेक गावातील वेगवेगळे वैशिष्टे आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ होय. जिल्हयात हळद उत्पादनासाठी शिरपूर जैन, काटा , मल्चिंग पध्दतीने शेती करण्यामध्ये मंगरुळपीर तालुका तर शेडनेटचे गाव म्हणून ओळख असलेले...  तसेच प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये ‘टो’ गावाचा समावेश आहे. या गावाच्या या प्रयोगाची प्रशासनाकडूनही दखल घेत २०१५-१६ मध्ये सदर प्रयोगाव्दारे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देवून जिल्हाधिकारी यांचेहस्त सत्कारही करण्यात आला होता.घरचेच बियाणे, सोबत सेंद्रीय खताचा वापर करुन ‘टो’ गावचे शेतकरी थांबले नाहीत तर आंतरपिकाच्या विविध प्रयोगातून उत्पादनात वाढ करुन एक आदर्श निर्माण केला आहे. अनेक शेतकरी आंतरपिक घेतात परंतु ठरल्याप्रमाणे नेहमी त्याच त्या पिकांचा समावेश असतो, परंतु ‘टो’ येथील शेतकरी जे पीके घेतात ते ऐकल्यावर असेही होवू शकते, असे करता येते असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होवून ते पाहणी करण्याकरीता जातात. येथीलच एका शेतकऱ्याने चक्क ५ आंतरपिके घेण्याची किमया यशस्वी करुन दाखविली आहे. त्याच पध्दतीने गावातील जवळपास प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कोणते ना कोणते आंतरपिक घेवून उत्पादन वाढीसोबतच आपला विकास साधतांना दिसून येत आहे. ‘टो’ येथील शेतकरी सोयाबीनमध्ये तूर, गव्हात हरभरा, मोहरी घेतातचं शिवाय हळदीमध्ये सुध्दा अनेक शेतकरी उडीदाचे आंतरपिक घेत आहेत. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी टोमॅटोमध्ये सांबार (कोथींबीर) आंतरपिक घेत आहेत. नगदी पिक म्हणून ओळख असलेल्या मिरची, टोमॅटो, आलू, गवार, जवस या पीकाचे उत्पन्न शेतकरी मोठया प्रमाणात घेत आहेत. सेंद्रीय शेतीव्दारे आंतरपिकाच्या माध्यमातून शेतामध्ये मिरचीचे उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या प्रल्हाद कडुजी काकडे, सुदाम निवृत्ती काकडे यांचा २०१५ -१६ मध्ये जिल्हाधिकारी यांचेकडून गौरव करुन पुरस्कार देण्यात आला होता.फळबागेतही आंतरपिक‘टो’ येथील शेतकरी शेतात आंतरपिक तर घेतातचं शिवाय गावातील १५ शेतकऱ्यांकडे फळबाग आहे. या फळबागेतही आंतरपिक घेवून एक नविन प्रयोग करतांना दिसून येत आहेत. संत्रा, लिंबुच्या फळबागांमध्ये गहू, अ‍ॅपल बोर, पालक, सांबार, मेथी, कांदा इत्यादीआंतरपिक घेत आहेत. फळबागेतून मिळणारे उत्पादन तर मिळेलच परंतु या फळबागांना पाणी देतांना याच पाण्यावर आंतरपिकाला पाणी मिळून दुहेरी फायदा होवून उत्पन्न घेत आहेत.शेती व्यवसाय करीत असताना कोण्या एका पिकावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण वातावरणातील बदल, निसगार्चा लहरीपणा , वारंवार कोसळणारे शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडत आहेत. कमी अधिक कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांमध्ये आंतर पीक घेणे फायदयाचे ठरते असा विश्वास टो येथील शेतकऱ्यांना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.आंतरपिक घेतल्याने उत्पादनात दिड पटाने वाढ होते. तसेच प्रतिकुल परिस्थितीमध्ये १०० टक्के निराश झाल्यापेक्षा काहींना काही शेतकऱ्यांच्या हाती पेैसा मिळून देणारे आंतरपिक पध्दत आहे.- नामदेव काकडे , शेतकरी, ‘टो’