शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आचारसंहितेची प्रभावी ...

वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.

या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी यांच्यासह आयकर विभाग उपायुक्त, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी या समितीतर्फे आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच पोटनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या ध्वनिफीत, चित्रफीत, सीडी इत्यादी साहित्याची तपासणी करून दूरचित्रवाणी आणि रेडिओ, केबल नेटवर्कवरून प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. या जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यासाठीदेखील जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

००००

जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष

निवडणूक आचारसंहिताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ बाय ७ तास सुरू राहणार असून मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षामध्ये किंवा दूरध्वनी क्रमांकावर, व्हाॅटसॲपद्वारे आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे आचारसंहिता विषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी स्पष्ट केले.

०००००

पेड न्यूज संदर्भातील तक्रारींच्या चौकशीसाठी समिती

पोटनिवडणूक काळात मुद्रित प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणाऱ्या पेड न्यूजच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांनी करावयाच्या खर्चावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. उमेदवाराने विहित मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास अशा उमेदवारास अनर्ह ठरविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत.