शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

नदीकाठावरील अतिक्रमणे अद्यापही कायमच

By admin | Updated: June 30, 2014 02:08 IST

पूरप्रवण भागातील अतिक्रमणे काढण्याचे वाशिम जिल्हाधिकार्‍याचे आदेश धाब्यावर.

वाशिम : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील नद्या,ओढयांच्या काठावरील गावांमधील व शहरांतील भागांमधील पूरप्रवण क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधलेल्या झोपड्यांची व अन्य अतिक्रमणे काढण्याचे आदेश मे महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील संबंधित अधिकार्‍यांना दिले होते.तथापि,अद्यापपर्यत कुठेही अशी अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.त्यामुळे आता पावसाळ्यात अतवृष्टीमुळे नद्या,ओढय़ांना पूर आल्यास नद्याकाठच्या घरांमधील नागरिकांची जिवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असलेतरी अद्यापपर्यत चांगला पाऊस पडण्यास प्रारंभ झालेला नाही.परंतु, आता लवकरच नियमित पावसाला प्रारंभ होण्याचे संकेत आहेत.जिल्ह्यात ओढे,कालवा , नदी किंवा अतवृष्टीमुळे धोका पोहोचू शकणारी १५२ गावे आहेत.वाशिम तालुक्यातील उकळीपेन ,रिसोड तालुक्यातील बाळखेड,पेनबोरी व चिंचाबापेन या गावांना पैनगंगा अतवृष्टीमुळे येणार्‍या पुराच्या पाण्याचा तर मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा खुर्द या गावाला गावाजवळून वाहणार्‍या नाल्याला अतवृष्टीमुळे येणार्‍या पुराच्या पाण्याचा वेढा पडत असतो.त्यामुळे या गावांना अधिक धोका संभवतो.कारंजा तालुक्यातील शेमलाई, अंबोडा, लाडेगाव, पिंपळगाव(खुर्द) ,सिरसोली, राहटी, हिंगणवाडी, रामटेक ,कामठा व बेलखेड या गावांनाही अतवृष्टीमुळे येणार्‍या पुराच्या पाण्याने नुकसान होण्याची बव्हंशी शक्यता असते. यामुळेच जिल्हाधिकार्‍यांनी पूरप्रवण भागातील अतिक्रमणे काढण्याबाबत सर्व तहसीलदारांसह संबंधित अधिकार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत झालेल्या सभेत आदेश दिले होते.परंतु, अद्यापपर्यंत कोणत्याची गावात अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.जून महिन्यात पाऊस झालाच नाही.परंतु, आता जुलै महिन्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता हवामानखात्याने व्यक्त केली आहे.त्यामुळे अतवृष्टी झाल्यास नद्या, नाल्यांच्या काठी व धरणांच्या खालच्या भागात राहणार्‍या लोकांवर जिवित व वित्तहानीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.