शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST

सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे ...

सर्व शासकीय प्रमाणपत्रे गावात आणि ऑनलाईन मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. यामुळे जन्म-मृत्यूचे दाखले, नाहकरत प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्र, उत्पन्नाचा दाखला आदी १३ प्रमाणपत्रासाठी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना अर्जदारांना लांब रांगेत उभे राहणे आवश्यक नाही. ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक ती कागदपत्रे मिळवू शकतात. ही सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत; परंतु आता या सेवा केंद्रातील संगणक जुने झाल्याने त्यात वारंवार बिघाड होत असून, दिवसाला ८ संगणक नादुरुस्त होत असल्याची माहिती या यंत्रणनेशी निगडीत घटकांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील जनतेला वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे.

------------------------

५० संगणक संच निकामीच

जिल्ह्यातील ४९१ आपले सरकार सेवा केंद्रांपैकी दरदिवशी ८ केंद्रांतील संगणकात बिघाड होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळणे कठीण होत आहे. त्यात जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील ५० संगणक संच निकामीच झाल्याने अडचणीत अधिकच वाढ झाली असून, हे संगणक कसेबसे दुरुस्त करून काम चालविण्याची कसरत यंत्रणेकडून केली जात आहे.

-----------------------

१० वर्षांपासून नवी खरेदीच नाही

आपले सरकार सेवा केंद्र योजना अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीत या योजनेंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. या सर्व केंद्रांसाठी २०११ मध्ये संगणक संचांची खरेदी करण्यात आली. आता दहा वर्षे उलटत आले असून, याच संगणक संचांच्याआधारे आपले सरकार सेवा केंद्रांचे काम सुरू असून, नवे संच खरेदीच करण्यात आलेले नाहीत.

--------------------

अनियमित वीज पुरवठ्याचा परिणाम

आपले सरकार सेवा केंद्राचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संगणकाकरिता वीज पुरवठा आवश्यक असतो; परंतु वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागांत वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यातून संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर परिणाम होऊन त्यात बिघाड निर्माण होतो. त्यामुळेच आपले सरकार सेवा केंद्रातील संगणकात वारंवार बिघाड येत आहेत.

--------------------

दुरुस्तीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा

वाशिम जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या हार्डवेअर इंजिनिअरकडून केले जाते. जिल्ह्यात एकाचदिवशी सहा ते आठ संगणक नादुरुस्त होत असतात आणि हे वेगवेगळ्या तालुक्यात घडते. संबंधित इंजिनिअरला एकाच दिवसांत सर्व तालुक्यात भेट देणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात दुरुस्तीसाठी आठवड्याला कॅम्प घेतला जातो.

--------

ग्रामस्तरावर मिळणारी मुख्य कागदपत्रे

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या

तालुका - आपले सरकार केंद्र

वाशिम - ८४

कारंजा - ९१

मालेगाव -८३

रिसोड - ८०

मानोरा - ७७

मंगरुळपीर -७६

---------

कोट : आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे संगणक १० वर्षे जुने असून, त्यात आता वारंवार बिघाड होत असल्याने जनतेला सुरळीत सेवा देण्यात अडचणीत येत आहेत.

- शेखर हिरगुडे

आपले सरकार सेवा केंद्रचालक, वाशिम

-----

कोट : आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक संचांना बिघाडाचे ग्रहण लागले आहे. वारंवार संगणक बंद पडत असून, दुरुस्तीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने जनतेला वेळेत कागदपत्रे देणे कठीण झाले आहे.

- ज्ञानेश्वर मुखमाले,

आपले सरकार सेवा केंद्रचालक, मंगरुळपीर

तथा तालुकाध्यक्ष संगणक परिचालक संघटना