शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले!

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

मंगरुळपीरची स्थिती; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीचा निष्कर्ष.

नाना देवळे/ मंगरूळपीर (वाशिम):यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे मंगरुळपीर कृषी बाजार समितीमधून घेण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या अवषर्णामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.विविध आपत्तींचा सामना करणार्‍या शेतकर्‍याला यंदा निसर्गाने चांगलेच त्रस्त केले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला. शेतीची सर्व कामे करून जमीन पेरणीसाठी तयार केल्यानंतरही पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. उशिराने आलेल्या थोड्याफार पावसाच्या आधारे अनेक शेतकर्‍यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आणि यात बराच वेळ निघून गेल्याने मूग, उडीदाच्या पिकांची वेळही राहिली नाही. पर्यायाने शेतकर्‍यांनी बहुतेक करून कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली. निकृष्ट बियाण्यांमुळे कित्येकांच्या शेतातील सोयाबीन उगवलेच नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या आधारामुळे सोयाबीन चांगलेच बहरले आणि शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरही हिरवळ निर्माण झाली; परंतु ती फार काळ टिकलीच नाही आणि पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील सुकत चाललेल्या ऐन शेंगा धरलेल्या सोयाबीनप्रमाणे शेतकर्‍यांचा चेहराही सुकत चालला होता. याच दरम्यान पिवळा मोझ्ॉक, चक्रीभुंगा आदी रोगांनीही सोयाबीनवर आक्रमण केल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली. कित्येक शेतकर्‍यांच्या शेतात, तर एकरी ५0 किलोएवढेच उत्पन्न झाले. पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनचे उपन्न घटल्याने अनेकांनी या पिकाच्या काढणीसाठी मजूरही लावले नाही. या कित्येक शेतकर्‍यांनी पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. गतवर्षी १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१३ पर्यंत मंगरुळपीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण ७ लाख ४0 हजार ६0३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, तर यावर्षीच्या हंगामात मात्र १ एप्रिल २0१४ ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत केवळ २८९ हजार ४६३ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे.