शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले!

By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST

मंगरुळपीरची स्थिती; कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीचा निष्कर्ष.

नाना देवळे/ मंगरूळपीर (वाशिम):यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे मंगरुळपीर कृषी बाजार समितीमधून घेण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. या अवषर्णामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.विविध आपत्तींचा सामना करणार्‍या शेतकर्‍याला यंदा निसर्गाने चांगलेच त्रस्त केले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला. शेतीची सर्व कामे करून जमीन पेरणीसाठी तयार केल्यानंतरही पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. उशिराने आलेल्या थोड्याफार पावसाच्या आधारे अनेक शेतकर्‍यांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले आणि यात बराच वेळ निघून गेल्याने मूग, उडीदाच्या पिकांची वेळही राहिली नाही. पर्यायाने शेतकर्‍यांनी बहुतेक करून कमी खर्चाचे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली. निकृष्ट बियाण्यांमुळे कित्येकांच्या शेतातील सोयाबीन उगवलेच नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या आधारामुळे सोयाबीन चांगलेच बहरले आणि शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरही हिरवळ निर्माण झाली; परंतु ती फार काळ टिकलीच नाही आणि पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील सुकत चाललेल्या ऐन शेंगा धरलेल्या सोयाबीनप्रमाणे शेतकर्‍यांचा चेहराही सुकत चालला होता. याच दरम्यान पिवळा मोझ्ॉक, चक्रीभुंगा आदी रोगांनीही सोयाबीनवर आक्रमण केल्याने या पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली. कित्येक शेतकर्‍यांच्या शेतात, तर एकरी ५0 किलोएवढेच उत्पन्न झाले. पावसाने दगा दिल्यामुळे सोयाबीनचे उपन्न घटल्याने अनेकांनी या पिकाच्या काढणीसाठी मजूरही लावले नाही. या कित्येक शेतकर्‍यांनी पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही. गतवर्षी १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१३ पर्यंत मंगरुळपीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण ७ लाख ४0 हजार ६0३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती, तर यावर्षीच्या हंगामात मात्र १ एप्रिल २0१४ ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत केवळ २८९ हजार ४६३ क्विंटल सोयाबीनचीच आवक झाली आहे.