शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका

By admin | Updated: June 22, 2016 00:36 IST

प्रवासी त्रस्त: कारंजा बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य.

कारंजा लाड (जि. वाशिम): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारंजा आगाराच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या आगारातील नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहेच. शिवाय बसस्थानक परिसरात पावसामुळे मोठमोठे डबके साचल्याने घाणीमुळे आरोग्यालाही धोका आहे. या आगारातील बर्‍याच बसेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. काही बसच्या खिडक्यांची तावदाणे फुटलेली आहेत, तर काहींची आसनेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश बसेस १५ लाख किलोमीटरपेक्षा अधिक चाललेल्या आहेत. या भंगार बसमधून प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अनेकदा प्रवासी मंडळातर्फे याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी करूनही या गंभीर बाबीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आगार प्रमुखाचे वाहक व चालकांवर नियंत्रण नसल्यामुळे अनेक बस ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार घडत आहे. कारंजा आगारातून काही लांब पल्ल्याच्या बसेसही सुटतात. त्या बसेसची स्थितीही फारशी चांगली नाही. जिल्ह्यांतर्गत धावणार्‍या काही बसेस रस्त्यात केव्हा नादुरुस्त होईल, याचा नेम नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा भंगार बसमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रवाशांनी अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. नादुरुस्त बसमुळे अनेकदा फेर्‍या रद्द होण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे प्रवाशांना खोळंबून राहावे लागत. याची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.