शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:11 IST

मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके  सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यात यंदा  सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. आता पावसाळा परतीच्या मार्गावर असताना पुढे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उरली नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ...

ठळक मुद्देमहिनाभरापासून पावसाची दडी: पिके सुकली, प्रकल्प आटले

मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके  सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

मानोरा तालुक्यात यंदा  सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. आता पावसाळा परतीच्या मार्गावर असताना पुढे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उरली नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीपाची पेरणी पहिल्याच महिन्यात ६० टक्के उरकण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे उर्वरित शेतकºयांनीही पेरणी उरकली. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात आली असताना जुलैच्या मध्यंतरी बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे पिक परिस्थिती सुधारली; परंतु आता महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने फुल, शेंगावर आलेली पिके सुकत चालली आहेत.  त्यातच मागील वर्षी तूर आणि सोयाबीनला अपेक्षीत भाव न मिळाल्याने तालुक्यातील  काही शेतकºयांनी मुग आणि उडिद या पिकाचा पेरा वाढविला. कमी कालावधीची ही पिके मात्र आता पावसाअभावी सुकत आहेत. मुगाच्या शेंगा दाणे धरण्यापूर्वीच सुकत असून, उडिदाचा फुलोरा पावसाअभावी गळत आहे. सोयाबीनची स्थितीही गंभीर झाली आहे. त्यामुळे यंदा पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. येत्या दोन चार दिवसांत पाऊस न आल्यास पिके  हातची जाणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

पावसासाठी देवाला साकडे 

तालुक्यात महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना तालुक्यातील कारखेडा येथे नामजप कार्यक्रमाचे आयोजन करून पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले आहे. कारखेडातील प्रसिद्ध शंकरगीर महाराज संस्थानवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून, यानिमित्त रविवार १३ आॅगस्ट रोजी नगरभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.