शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:11 IST

मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके  सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मानोरा तालुक्यात यंदा  सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. आता पावसाळा परतीच्या मार्गावर असताना पुढे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उरली नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ...

ठळक मुद्देमहिनाभरापासून पावसाची दडी: पिके सुकली, प्रकल्प आटले

मानोरा: महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे मानोरा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आला आहे. पावसाअभावी पिके  सुकत चालली असून, सर्व जलप्रकल्पही आटत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

मानोरा तालुक्यात यंदा  सरासरीच्या तुलनेत अर्धाही पाऊस पडलेला नाही. आता पावसाळा परतीच्या मार्गावर असताना पुढे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उरली नाही. त्यामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीपाची पेरणी पहिल्याच महिन्यात ६० टक्के उरकण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे उर्वरित शेतकºयांनीही पेरणी उरकली. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात आली असताना जुलैच्या मध्यंतरी बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे पिक परिस्थिती सुधारली; परंतु आता महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने फुल, शेंगावर आलेली पिके सुकत चालली आहेत.  त्यातच मागील वर्षी तूर आणि सोयाबीनला अपेक्षीत भाव न मिळाल्याने तालुक्यातील  काही शेतकºयांनी मुग आणि उडिद या पिकाचा पेरा वाढविला. कमी कालावधीची ही पिके मात्र आता पावसाअभावी सुकत आहेत. मुगाच्या शेंगा दाणे धरण्यापूर्वीच सुकत असून, उडिदाचा फुलोरा पावसाअभावी गळत आहे. सोयाबीनची स्थितीही गंभीर झाली आहे. त्यामुळे यंदा पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. येत्या दोन चार दिवसांत पाऊस न आल्यास पिके  हातची जाणार असल्याचे मत कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

पावसासाठी देवाला साकडे 

तालुक्यात महिनाभरापासून पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना तालुक्यातील कारखेडा येथे नामजप कार्यक्रमाचे आयोजन करून पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले आहे. कारखेडातील प्रसिद्ध शंकरगीर महाराज संस्थानवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून, यानिमित्त रविवार १३ आॅगस्ट रोजी नगरभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.