शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शेतक-यांना दुष्काळी मदतीची आस

By admin | Updated: December 30, 2015 01:56 IST

केंद्राची मदत जाहीर; गतवर्षी वाशिम जिल्ह्याला मिळाले होते ५७.५३ कोटी.

वाशिम : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यापैकी वाशिम जिल्ह्याला किती पॅकेज मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. वाशिम जिल्ह्याला सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळसदृश स्थितीचा फटका बसला आहे. दुष्काळाबाबत तलाठी, महसूल विभाग, नजर आणेवारी, सुधारित आणेवारी, केंद्रीय पथकाची पाहणी असा शासकीय सोपस्कार पार पडला असून, सर्व अहवाल पाहता जिल्ह्याला भरीव स्वरुपाचा दुष्काळी मदत निधी मिळण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशापेक्षा अधिक होती; मात्र सत्ताधारी आमदारांचा पाठपुरावा आणि विरोधकांचे आंदोलन यामुळे जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची सुधारित पैसेवारी ४४ पैसे जाहीर झाली होती. कारंजा ४२, मानोरा ४५, वाशिम ४३, मंगरुळपीर ४४, रिसोड व मालेगावची सुधारित पैसेवारी प्रत्येकी ४६ अशी आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नसल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता दुष्काळी मदत निधी जाहीर झाल्याने जिल्ह्याला किती निधी मिळणार, त्याचे निकष काय, पॅकेजचे स्वरुप काय, आदी प्रश्नांच्या उत्तराकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.