शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शेतक-यांना दुष्काळी मदतीची आस

By admin | Updated: December 30, 2015 01:56 IST

केंद्राची मदत जाहीर; गतवर्षी वाशिम जिल्ह्याला मिळाले होते ५७.५३ कोटी.

वाशिम : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला असून, महाराष्ट्रासाठी ३0५0 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यापैकी वाशिम जिल्ह्याला किती पॅकेज मिळणार, याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला ३0५0 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. वाशिम जिल्ह्याला सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळसदृश स्थितीचा फटका बसला आहे. दुष्काळाबाबत तलाठी, महसूल विभाग, नजर आणेवारी, सुधारित आणेवारी, केंद्रीय पथकाची पाहणी असा शासकीय सोपस्कार पार पडला असून, सर्व अहवाल पाहता जिल्ह्याला भरीव स्वरुपाचा दुष्काळी मदत निधी मिळण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशापेक्षा अधिक होती; मात्र सत्ताधारी आमदारांचा पाठपुरावा आणि विरोधकांचे आंदोलन यामुळे जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची सुधारित पैसेवारी ४४ पैसे जाहीर झाली होती. कारंजा ४२, मानोरा ४५, वाशिम ४३, मंगरुळपीर ४४, रिसोड व मालेगावची सुधारित पैसेवारी प्रत्येकी ४६ अशी आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नसल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता दुष्काळी मदत निधी जाहीर झाल्याने जिल्ह्याला किती निधी मिळणार, त्याचे निकष काय, पॅकेजचे स्वरुप काय, आदी प्रश्नांच्या उत्तराकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे.