शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

पावसाची रिपरिप थांबली, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना ...

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना वारंवार बसत आहे. जूनमध्ये मध्यंतरी पावसाने खंड दिला, तर जुलैच्या मध्यंतरानंतर अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गत आठवड्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुकू लागलेल्या पिकांना या दमदार पावसामुळे संजीवनी मिळाली; परंतु पावसाने पिच्छाच पुरविला. दरदिवशी पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून पिके पिवळी पडण्यासह पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरीवर्गांत चिंतेचे वातावरण होते. आता रविवारपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाला वेग दिला असून, पिके चांगली बहरू लागली आहेत.

-----------------

सहा दिवसांत ७६ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन-तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत होता. त्यामुुळेच पावसाच्या सरासरीतही मोठी वाढ झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

-----------------

पिकांच्या वाढीवर परिणाम

मागील आठवड्यात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचले होते. पाणी साचल्याने जमीन घट्ट होण्यासह पिकांच्या मुळांना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन) मिळणे अशक्य होते. परिणामी पिकांची वाढ खुंटून मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडण्यासह बुरशी वाढून पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

-----------

कोट : पावसाने उसंत घेतल्याने आता पिके चांगली वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचले असेल, तर ते तातडीने काढून पिकांत हवा खेळती राहील, यासाठी उपाय योजना कराव्यात.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.