शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पावसाची रिपरिप थांबली, शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना ...

जिल्ह्यात यंदा ३ लाख ९७ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना वारंवार बसत आहे. जूनमध्ये मध्यंतरी पावसाने खंड दिला, तर जुलैच्या मध्यंतरानंतर अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गत आठवड्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. सुकू लागलेल्या पिकांना या दमदार पावसामुळे संजीवनी मिळाली; परंतु पावसाने पिच्छाच पुरविला. दरदिवशी पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून पिके पिवळी पडण्यासह पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरीवर्गांत चिंतेचे वातावरण होते. आता रविवारपासून पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी तण व्यवस्थापनाला वेग दिला असून, पिके चांगली बहरू लागली आहेत.

-----------------

सहा दिवसांत ७६ मि.मी. पाऊस

जिल्ह्यात सोमवार १६ ऑगस्ट ते शनिवार २१ ऑगस्टदरम्यान सहा दिवसांच्या कालावधीत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने ठाणच मांडले आहे. दोन-तीन तासांची विश्रांती घेत पाऊस दरदिवशी सर्वत्र हजेरी लावत होता. त्यामुुळेच पावसाच्या सरासरीतही मोठी वाढ झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

-----------------

पिकांच्या वाढीवर परिणाम

मागील आठवड्यात पाऊसमान जास्त झाल्याने शेतात पाणी साचले होते. पाणी साचल्याने जमीन घट्ट होण्यासह पिकांच्या मुळांना जमिनीतून अपटेक (जमिनीतून उपलब्ध खताचे/अन्नद्रव्ये सेवन) मिळणे अशक्य होते. परिणामी पिकांची वाढ खुंटून मूळ अतिपाण्यामुळे कुजून पिवळी पडण्यासह बुरशी वाढून पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

-----------

कोट : पावसाने उसंत घेतल्याने आता पिके चांगली वाढणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचले असेल, तर ते तातडीने काढून पिकांत हवा खेळती राहील, यासाठी उपाय योजना कराव्यात.

- शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.