शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

‘कोरोना’चे वाहक होऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. शासनाचे निर्बंध हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असून, याचे पालन प्रत्येकाने केल्यास निश्चितच कोरोनाचा आलेख खाली आल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे निदान लवकर झाले तर संबंधित रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे सर्दी, ताप किंवा अन्य कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येताच चाचणी करणे आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत काही जण सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतानाही कोरोना चाचणी करण्यास विलंब करतात. त्यांना चाचणीचा सल्ला दिल्यानंतरही ‘मला काही झाले नाही, औषधोपचार द्या, त्यानेच ठीक होईल’ अशी कारणे सांगून चाचणी करण्यास टाळाटाळ करतात आणि कुटुंबात वावरतात. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील कोरोना संसर्ग होतो. वेळेवर चाचणी न केल्यामुळे योग्य औषधोपचार वेळेत मिळत नाहीत. परिणामी, एखाद्या वेळी प्रकृती गंभीर बनू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसताच तातडीने चाचणी केली तर रुग्णही लवकर बरा होतो आणि त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणही नगण्यच असते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी ही बाब गांभीर्याने घेऊन दक्षता घेतली तर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास फारसा वेळ लागणार नाही. कोरोनाचे वाहक ठरणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आज काळाची गरज ठरत आहे.

- डॉ. प्रवीण ठाकरे

छातीरोग तज्ज्ञ, वाशिम