शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘कोरोना’चे वाहक होऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची स्थिती धोकादायक वळणावर येऊन ठेपत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. शासनाचे निर्बंध हे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असून, याचे पालन प्रत्येकाने केल्यास निश्चितच कोरोनाचा आलेख खाली आल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे निदान लवकर झाले तर संबंधित रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे सर्दी, ताप किंवा अन्य कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येताच चाचणी करणे आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीत काही जण सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतानाही कोरोना चाचणी करण्यास विलंब करतात. त्यांना चाचणीचा सल्ला दिल्यानंतरही ‘मला काही झाले नाही, औषधोपचार द्या, त्यानेच ठीक होईल’ अशी कारणे सांगून चाचणी करण्यास टाळाटाळ करतात आणि कुटुंबात वावरतात. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील कोरोना संसर्ग होतो. वेळेवर चाचणी न केल्यामुळे योग्य औषधोपचार वेळेत मिळत नाहीत. परिणामी, एखाद्या वेळी प्रकृती गंभीर बनू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसताच तातडीने चाचणी केली तर रुग्णही लवकर बरा होतो आणि त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणही नगण्यच असते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी ही बाब गांभीर्याने घेऊन दक्षता घेतली तर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास फारसा वेळ लागणार नाही. कोरोनाचे वाहक ठरणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आज काळाची गरज ठरत आहे.

- डॉ. प्रवीण ठाकरे

छातीरोग तज्ज्ञ, वाशिम