शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे ...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते; अन्य ऋतूंमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

........................

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे विविध स्वरूपातील संसर्गजन्य आजार पसरतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार जडण्यासोबतच सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे काविळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात.

...............

पाणी उकळून प्यायलेले बरे

उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोमट पाणी अनेक आजारांपासून शरीराला सुरक्षित ठेवते. सकाळच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर अनशापोटी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एका तासाने कोमट पाणी प्याल्याने कफ व पोटाचे विकार नाहीसे होतात.

..................

आजाराची लक्षणे

दूषित पाणी प्याल्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शाैचास होण्याचा विकार जडू शकतो. त्यास अतिसार म्हणतात.

दूषित पाणी तसेच अन्नपदार्थांमधून पसरणारी कावीळ वर्षभर असते ; मात्र पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.

उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणेही दूषित पाण्यातून दिसून येतात. त्यास गॅस्ट्रो म्हणून संबोधण्यात येते.

पोलिओ आणि विषमज्वर यासारखे आजारही दूषित पाणी पिण्यात आल्याने होतात.

....................

वाशिमकर दररोज पितात १० दलघमी पाणी

वाशिम तालुक्यातील केकतउमरा गावानजिकच्या एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना नळाव्दारे १० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दरडोई १२५ लीटर पाणी पुरविण्यात येते. पाणी शुद्धीकरणाची रीतसर प्रक्रिया राबवूनच निर्जंतुक झालेले पाणी नळाव्दारे पुरविण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे पंकज सोनोने यांनी दिली.