शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

विभागात जिल्हा दुसरा!

By admin | Updated: May 31, 2017 00:49 IST

बारावीचा निकाल : मुलींनी मारली बाजी

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. यावर्षी ९०.८१ टक्के निकाल लागला आहे. अमरावती विभागात अकोला ८९.८१, अमरावती ८९.९५, यवतमाळ ८४.८० व वाशिम ८९.१२ असा निकाल असून, बुलडाणा जिल्हा ‘द्वितीय’ ठरला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे. बारावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील ३१ हजार ९०० विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ३१ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये २८ हजार ९३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ९०.८१ टक्के एवढा लागला आहे. बुलडाणा, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद व संग्रामपूर या सर्वच तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे अधिक आहे.बदलत्या काळात बारावीच्या निकालापेक्षाही नीट, पीएमटी, पीईटीच्या निकालाची अनेकांना अधिक प्रतीक्षा असल्याने, तसेच निकाल आॅनलाइन असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालयांच्या परिसरात मंगळवारी जल्लोषाचे चित्र दिसून आले नाही. सायबर कॅफेवरही फारशी गर्दी दिसून आली नाही. गुणवत्ता यादी बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील गुणवंत शोधण्याची धडपड करताना अनेक शाळांमधील शिक्षक दिसून आले. अनेक विद्यार्थी हे जिल्ह्यातील असले, तरी विविध क्लासेसच्या निमित्ताने बाहेर जिल्ह्यात शिकत आहेत. तेथेही या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी दाखविली आहे. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात कौतुक होत आहे.तेराही तालुक्यांत मुलीच अव्वलबारावी परीक्षेच्या निकालात गेल्या सहा वर्षांपासून सतत बाजी मारणाऱ्या मुलींनी यावर्षीही चमक दाखविली आहे. तेराही तालुक्यात मुली अव्वल आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ९२७ मुलींनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १३ हजार ९१५ मुलींनी परीक्षा दिली असून, यामधून १३ हजार ९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे, तर १७ हजार ९७३ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, प्रत्यक्षात १७ हजार ९५४ मुले परीक्षेला बसली. यापैकी १५ हजार ९३० म्हणजेच ८८.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींमध्ये जिल्हा अमरावती विभागात अव्वल अमरावती विभागात मुलींमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल आहे. अमरावती जिल्ह्यात मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३७ टक्के आहे, तर अकोला जिल्ह्याची ९३.१४ टक्के, वाशिम ९२.२७ टक्के, यवतमाळ ८८.५५ टक्के बुलडाणा ९३.४९ टक्के आहे.