शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

मध्यस्थी प्रक्रियेने आपसातील तंटे सोडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होण्याबरोबरच दोन्ही पक्षकारांचा विजय होतो. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती ...

वाशिम : मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होण्याबरोबरच दोन्ही पक्षकारांचा विजय होतो. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती प्रक्रियेने सोडविण्याचे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा श. सावंत यांनी १८ सप्टेंबर रोजी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. सी. एन मवाळ, अॅड. एस. एन. काळू, विविध बँकांचे प्रतिनिधी, विधिज्ञ व पक्षकार यांची उपस्थिती होती.

मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, अॅड. एस. एन. काळू यांनी यावेळी मध्यस्थी प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गीतांजली गवळी यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्या. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.