शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या ...

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास १० लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने अत्यल्प आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे.

..................

१) भेसळ किती?

२०२० घेतलेले नमुने भेसळ

९०/२

जानेवारी २०२१ - ५/२

फेब्रुवारी - ५/०

मार्च - ९/३

एप्रिल - ४/०

मे - ८/१

जून - १०/१

जुलै - ७/०

ऑगस्ट - २/०

........................

कोरोनाकाळात २६ हजारांचा दंड वसूल

जिल्ह्यात कार्यरत अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून कोरोनाकाळात २०२० मध्ये ९० आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ५० असे एकूण १४० खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील ९ नमुने कमी दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संबंधितांना २६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

..............

खरेदी करताना घ्या काळजी

श्रावण महिन्यापासून महत्त्वाच्या सणासुदींना सुरुवात होते. यादरम्यान तेल, दूध दुग्धजन्य पदार्थ, पीठ, साखर, तूप यासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीत अचानक वाढ होते. ही संधी हेरून काहीजण खाद्यपदार्थांत भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

.............

सणासुदीच्या काळात वाढते तपासणीचा वेग

सणासुदीच्या काळात हाॅटेल्समध्ये मिळणाऱ्या विविध स्वरूपातील आयत्या खाद्यपदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याचा प्रकारही वाढीस लागतो. तो रोखण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून या काळात तपासणीला विशेष वेग दिला जातो.

..............

कोट :

वाशिम जिल्ह्यात दोन अन्नसुरक्षा अधिकारी कार्यरत होते. त्यापैकी एकाची आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यात एकूण १४० खाद्यपदार्थ नमुने तपासण्यात आले. त्यातील ९ नमुने कमी दर्जाचे आढळले. संबंधितांना दंड ठोठावण्यात आला आहे.

- नीलेश ताथोड, अन्नसुरक्षा अधिकारी, कारंजा