शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

महावितरणकडून मागण्या मान्य; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू ...

रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू होते. उन्हाळी मूगसह इतर पिके ऐन पाण्यावर असताना सुरू झालेली ही कारवाई शेतकरी बांधवांना अन्यायकारक होती. त्यातच वीज वापरापेक्षा आलेले अतिरिक्त बिल यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले होते. याविरोधात ॲड.नकुल देशमुख यांनी महावितरणविरोधात आक्रमक हाेत आणि शेतकरी बांधवँना होणारा त्रास आणि अन्याय आम्ही सहन करणार नाही. लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन जोडून वीजबिल भरण्यासाठी विशेष आणि शेतकऱ्यांना सोईची होईल अशी व्यवस्था करावी, अन्यथा चक्का जाम करून महावितरण कार्यालय बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. यासाठी १८ मार्चची मुदत दिली गेली होती. तत्पूर्वी महावितरण अधिकारी यांनी शेतकरीहिताची भूमिका घेत शेतकरी बांधवांचे तोडलेले सर्व वीज कनेक्शन जोडले जातील, ३००० रुपये भरून बाकी बिल सवलतीने भरणा करता येईल,अशी सूट दिली. पंचायत समिती रिसोड येथे ॲड. नकुल देशमुख यांची महावितरण अधिकारी फुलझडे यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत ह्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. यावेळी वाशिम जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात, नारायणराव सानप, महावितरण कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.