शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

महावितरणकडून मागण्या मान्य; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू ...

रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू होते. उन्हाळी मूगसह इतर पिके ऐन पाण्यावर असताना सुरू झालेली ही कारवाई शेतकरी बांधवांना अन्यायकारक होती. त्यातच वीज वापरापेक्षा आलेले अतिरिक्त बिल यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले होते. याविरोधात ॲड.नकुल देशमुख यांनी महावितरणविरोधात आक्रमक हाेत आणि शेतकरी बांधवँना होणारा त्रास आणि अन्याय आम्ही सहन करणार नाही. लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन जोडून वीजबिल भरण्यासाठी विशेष आणि शेतकऱ्यांना सोईची होईल अशी व्यवस्था करावी, अन्यथा चक्का जाम करून महावितरण कार्यालय बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. यासाठी १८ मार्चची मुदत दिली गेली होती. तत्पूर्वी महावितरण अधिकारी यांनी शेतकरीहिताची भूमिका घेत शेतकरी बांधवांचे तोडलेले सर्व वीज कनेक्शन जोडले जातील, ३००० रुपये भरून बाकी बिल सवलतीने भरणा करता येईल,अशी सूट दिली. पंचायत समिती रिसोड येथे ॲड. नकुल देशमुख यांची महावितरण अधिकारी फुलझडे यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत ह्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. यावेळी वाशिम जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात, नारायणराव सानप, महावितरण कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.