शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

कर्जमाफीच्या प्रस्तावित यादीवरून उडतोय गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:07 IST

शेतकरी आक्रमक : स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या निर्णयानुसार कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम बँकांमार्फत करण्यात येत आहे; मात्र त्यात पुरता गोंधळ उडत असून कर्जमाफीच्या निकषांबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकरी आक्रमक; तर प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्यानंतर राज्यसरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर केली. शासनाने दीड लाख रुपयांची मर्यादा घालून सरसकट कर्जमाफी दिली. ही कर्जमाफी १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंतच्या कालावधीत घेतलेल्या पीक व मध्यम मुदतीच्या कर्जाच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठीच असल्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यातच कर्जमाफीसाठी कठोर निकष व दीड लाख रुपयांची आर्थिक मर्यादा घालण्यात आली. तथापि, बऱ्याच थकबाकीदार शेतकऱ्यांचे २००७-२०१२ या काळात घेतलेले कर्ज थकलेले आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे या निर्णयानुसार स्पष्ट झाल्यामुळे शेतकरी आणि विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. या दबावामुळे शासनाने फेरविचार करून २००९ पासून थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे ठरविले. दरम्यान, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीची गरज असून, नियमांचेही अडथळे आहेत. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम बँका आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयांकडून करण्यात येत आहे.असे असले तरी, शासनाचे निकष आणि कर्जमाफीच्या वर्षाची मुदतच स्पष्ट नसल्याने वाशिम जिल्ह्यात अद्याप या प्रक्रियेचा पहिला टप्पादेखील पूर्ण झाला नसल्याचे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २४ हजार ३३५ आहे. या शेतकऱ्यांकडे ९७ कोटी २३ लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत आहे. यापैकी २३ हजार ५३१ शेतकरी हे दीड लाख रुपये कर्जमाफीच्या कक्षेत येतात. त्यापैकी किती शेतकऱ्यांची यादी तयार झाली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु अद्याप जिल्ह्यातील एकाही बँकेची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर झालेली नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कर्जमाफीदार शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबतच चालल्याचे दिसून येत आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तथापि, या निर्णयात वारंवार बदल झाल्याने नेमकी कोणत्या वर्षाची यादी तयार करावी, हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे.-ए. एल वैद्य मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, अकोला शासनाच्या कर्जमाफीच्या शर्ती आणि अटीनुसार जिल्ह्यातील सर्वच बॅँकांमार्फत कर्जमाफीस पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागविण्यात येत आहेत. ही प्रक्रिया किचकट असल्याने याद्या तयार करण्यास विलंब लागत आहे. हे काम त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.-रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशिम.