शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

कर्जमाफी निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:57 IST

पात्र शेतकरी संभ्रमात : बँका गुंतल्या याद्या तयार करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अस्मानी, सुलतानी संकटांमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळण्याकरिता थेट राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन छेडले. त्याचा सकारात्मक फायदा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली; मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दुसरीकडे पीक कर्ज वाटप करणाऱ्या सर्वच बँका गेल्या अनेक दिवसांपासून केवळ याद्या तयार करण्यातच गुंतल्याने कर्जमाफी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१२ नंतरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार, बँकांकडून याद्या मागविण्यात आल्या; मात्र त्यावर शेतकरी संघटना तथा विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर तीन वर्षे मागे जात २००९ पासून पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा बँकांकडून सुधारित याद्या मागविण्यात येत आहेत. तथापि, दैनंदिन बँकिंग व्यवहार सांभाळून कर्जमाफीस पात्र ठरू शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या गोळा करण्यातच बँकांचा अधिक वेळ जात असून, कर्जमाफी मिळण्यास विलंब होत असल्याने नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचीही गोची झाली आहे. कर्जमाफीच्या या गदारोळात १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वेगळे वक्तव्य करून ज्यांचे उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे जाहीर करून ज्यांची उपजीविका निव्वळ शेतीवरच अवलंबून आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळेल, असा फतवा जाहीर केल्याने कर्जमाफीच्या निर्णयातील घोळ कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.