शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात सिंचन विहिरी मंजुरीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST

मंगरुळपीर ...... तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहीर मंजुरीस विलंब करणाऱ्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ३० ऑगस्ट रोजी ...

मंगरुळपीर ...... तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन विहीर मंजुरीस विलंब करणाऱ्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ३० ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजना मंत्री यांच्यासह अनेकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

वाशिम जिल्ह्यात सहा तालुके येतात; परंतु सहा तालुक्याला दिलेला लक्षांक पूर्ण करण्यात मंगरुळपीरचे गटविकास अधिकारी अपयशी झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात स्पष्ट नमूद केलेले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला होता. त्यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे उद्दिष्टसुद्धा ठरवून दिले होते, तसेच तालुक्यात २०१५ पासून तर २०२१ पर्यंत पंचायत समितीने मग्रारोहयो योजनेअंतर्गत विहिरीच मंजूर केल्या नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्वच शेतकऱ्यांना सिंचन विहिरीपासून वंचित राहावे लागले आहे. म्हणून निष्क्रिय अधिकारी यांच्यावर तातडीने दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा व शासनाच्या निर्णयाचे अवमान करणे या विषयावरून संबंधित गटविकास अधिकारी यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी. याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचायत समितीला प्रस्ताव सादर केले; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या निर्णयाविरुद्ध निर्णय घेऊन असहकार्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. उपलब्ध झालेल्या प्रस्तावांपैकी केवळ २५ सिंचन विहिरींना मान्यता दिल्याचे कळते आणि इतर तालुक्यांतील मंजुरीचा लक्षांक लक्षात घेता प्रथम क्रमांक वाशिम, रिसोड तालुक्याचा लागतो. मंगरुळपीर तालुक्यात प्राप्त झालेल्या अर्जावर गटविकास अधिकारी यांनी मान्यता देण्यास विलंब का केला ? याची कारणे शोधणे गरजेचे आहे . इतर तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी शासनाने दिलेल्या लक्षांक पूर्ण करून त्याप्रमाणे त्यांनी मंजुरी पत्र दिलेले आहेत. सिंचन विहिरींना २७ ऑगस्टपर्यंत मंजुरी द्यावी, अन्यथा ३० ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख, सागर म्हैसने, चेतन येवले, सतीश गावंडे, संतोष इंगळे, दिलीप भगत, गोपाल लुंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.