शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

कपाशीची लागवड ‘जैसे थे’ राहण्याचा अंदाज

By admin | Updated: May 20, 2017 01:45 IST

खरीप हंगामाचे नियोजन : चार लाख हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने पीकनिहाय पेरणीचा अंदाज बांधला आहे. यानुसार यावर्षी ४ लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे. दरम्यान, कृषी विभागाने मागणी नोंदविल्यानुसार, आता बियाणे प्राप्त होण्यास प्रारंभ झाला आहे.गतवर्षी जिल्ह्यावर मेहेरबान असलेला वरुण राजा यावर्षीही वेळेवर हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेतकरी आतापासूनच पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवत असल्याचे चित्र पहावयास मिळते. बी-बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने नियोजन केले असून, पेरणीच्या अंदाजानुसार बियाणे व खतांची मागणी नोंदविली आहे. गतवर्षी खरीप हंगामात ४ लाख २ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हेक्टरवर अर्थात २ लाख ८७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. त्या खालोखाल ६३ हजार ५०१ हेक्टरवर तूर, १२ हजार ६८० हेक्टरवर मूग, १५ हजार २१७ हेक्टरवर उडीद, १९२ हेक्टरवर तीळ, १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशी आणि २४३ हेक्टरवर अन्य पिकांचा पेरा होता. साधारणत: १५ वर्षांपूर्वी ‘कॉटन बेल्ट’ म्हणून लौकिक असलेल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनने प्रवेश केला. सोयाबीनच्या प्रवेशानंतर कपाशीच्या लागवडीत प्रचंड घट झाली. सव्वा लाखांवर असलेला कपाशीचा पेरा आता १८ ते २० हजार हेक्टरच्या आसपास स्थिरावत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षीही कपाशीची लागवड १८ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. यावर्षी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राहणार असून, २ लाख ८० हजार ४०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. खरिपाचा पेरा लक्षात घेता कृषी विभागाने ९२ हजार ९६३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली होती. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महाबीज व खासगी बियाण्यांचा समावेश आहे.मूग व उडिदाचा पेरा वाढविण्याचा प्रयत्नयावर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हा अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने मूग व उडीदाचा पेरा वाढविण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी साडेबारा हजाराच्या आसपास असलेला मूगाचा पेरा यावर्षी २५ हजार हेक्टरवर करण्याचे नियोजन आहे. गतवर्षी १५ हजाराच्या आसपास असलेला उडीदाचा पेरा यावर्षी २४ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. कपाशी बियाण्यांची एक लाख पाकिटांची मागणीयावर्षी १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड गृहित धरून त्या अनुषंगाने बिटी कापूस बियाण्याच्या एक लाख पाकिटांची मागणी कृषी विभागाने वरिष्ठांकडे नोंदविली आहे. १८ मे पर्यंत जिल्ह्याला २६ हजार ६६० पाकिटांचा पुरवठा झाला आहे. लागवडीच्या तुलनेत कपाशीसह कोणत्याही बियाण्यांची टंचाई भासणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती प्रभारी कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांनी दिली.