शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

कपाशीची लागवड ‘जैसे थे’ राहण्याचा अंदाज

By admin | Updated: May 20, 2017 01:45 IST

खरीप हंगामाचे नियोजन : चार लाख हेक्टरवर होणार पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असून, कृषी विभागाने पीकनिहाय पेरणीचा अंदाज बांधला आहे. यानुसार यावर्षी ४ लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे. दरम्यान, कृषी विभागाने मागणी नोंदविल्यानुसार, आता बियाणे प्राप्त होण्यास प्रारंभ झाला आहे.गतवर्षी जिल्ह्यावर मेहेरबान असलेला वरुण राजा यावर्षीही वेळेवर हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऐनवेळी धावपळ नको म्हणून शेतकरी आतापासूनच पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवत असल्याचे चित्र पहावयास मिळते. बी-बियाणे, खतांची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने नियोजन केले असून, पेरणीच्या अंदाजानुसार बियाणे व खतांची मागणी नोंदविली आहे. गतवर्षी खरीप हंगामात ४ लाख २ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त हेक्टरवर अर्थात २ लाख ८७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होती. त्या खालोखाल ६३ हजार ५०१ हेक्टरवर तूर, १२ हजार ६८० हेक्टरवर मूग, १५ हजार २१७ हेक्टरवर उडीद, १९२ हेक्टरवर तीळ, १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशी आणि २४३ हेक्टरवर अन्य पिकांचा पेरा होता. साधारणत: १५ वर्षांपूर्वी ‘कॉटन बेल्ट’ म्हणून लौकिक असलेल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनने प्रवेश केला. सोयाबीनच्या प्रवेशानंतर कपाशीच्या लागवडीत प्रचंड घट झाली. सव्वा लाखांवर असलेला कपाशीचा पेरा आता १८ ते २० हजार हेक्टरच्या आसपास स्थिरावत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षीही कपाशीची लागवड १८ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. यावर्षी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राहणार असून, २ लाख ८० हजार ४०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. खरिपाचा पेरा लक्षात घेता कृषी विभागाने ९२ हजार ९६३ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली होती. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये महाबीज व खासगी बियाण्यांचा समावेश आहे.मूग व उडिदाचा पेरा वाढविण्याचा प्रयत्नयावर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हा अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने मूग व उडीदाचा पेरा वाढविण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षी साडेबारा हजाराच्या आसपास असलेला मूगाचा पेरा यावर्षी २५ हजार हेक्टरवर करण्याचे नियोजन आहे. गतवर्षी १५ हजाराच्या आसपास असलेला उडीदाचा पेरा यावर्षी २४ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. कपाशी बियाण्यांची एक लाख पाकिटांची मागणीयावर्षी १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड गृहित धरून त्या अनुषंगाने बिटी कापूस बियाण्याच्या एक लाख पाकिटांची मागणी कृषी विभागाने वरिष्ठांकडे नोंदविली आहे. १८ मे पर्यंत जिल्ह्याला २६ हजार ६६० पाकिटांचा पुरवठा झाला आहे. लागवडीच्या तुलनेत कपाशीसह कोणत्याही बियाण्यांची टंचाई भासणार नाही. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती प्रभारी कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांनी दिली.