शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शेकडो हेक्टरवरील पिकांना मिळाली नवसंजीवनी

By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST

कारंजालाड सह रिसोड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस.

कारंजालाड : विजेच्या प्रचंड कडकडाटात प्रतीक्षेतील पावसाचे शुक्रवारी तासभर दमदार आगमन झाल्याने परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.सायंकाळी ५ वाजतापासून आकाशात मेघांनी गर्दी केली होती. लगेचच शहराच्या काही परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यास सुरूवात झाली; मात्र त्यानंतर थोडावेळ उसंत घेतल्यानंतर ६.३0 पासून विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी ७ पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. किमान एक तासभर दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे. पावसाच्या लपंडावामुळे शहर परिसरातील शेकडो एकरावरील पिके धोक्यात आली होती. सोयाबीन पिकाने माना टाकायला सुरुवात केली होती. अवर्षणामुळे बाजारपेठेतही मंदीचे सावट पसरल्याने पावसासाठी नागरिक देवाला साकडे घालत होते. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. या पावसामुळे बाजारपेठेतील रेलचेल वाढण्याची शक्यता आहे. वृत्त लिहेपर्यंत शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता. कामरगाव येथे वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. जलालपूर येथील शेतकरी दादाराव गावंडे यांच्या घराजवळील जुने झाड तुटून गोठय़ावर पडल्याने त्यांचा बैल गंभीर जखमी झाला. याचा तलाठी व सरपंच साहेबराव तुमसरे यांनी पाहणी करून पंचनामा केला. शेतकर्‍याने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मानोरा शहरातही २२ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३0 च्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कारंजा तालुक्यातील पिकाप्रमाणे मानोरा तालुक्यातील पिकांनीही पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील मरणासन्न झालेले पीक पुन्हा डोलू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.