शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि ...

राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि झोपड्या वाहून गेलेल्या आहेत, छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय चालविणे अशक्य झालेले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा नसल्यामुळे गरिबांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पिकांच्या नासाडीचे पंचनामे कुर्म गतीने होत आहेत. महाराष्ट्रभर पसरलेल्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहून काळजी व्यक्त केलेली आहे. या संबंधित जमात-ए-इस्लामी हिंद शाखा रिसोडने २४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदतीचे वितरण करण्यात यावे. कच्च्या घरांची आणि झोपड्यांच्या झालेल्या हानीचे सुद्धा पंचनामे करून त्यांनाही तत्काळ आर्थिक सहायता प्रदान करण्यात यावी. शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्यात यावी. कोविड दरम्यान मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना शेख रिजवान, शेख वकार, प्रा.मो. जुनेद,मकसूद अहमद मोइनुद्दीन आदी उपस्थित होते.