शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

कृषी विभागाची आकडेवारी: नव्वद टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली!

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे वाढत असल्याने जिल्ह्यातून दरवर्षी कपाशी पेरणीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना यंदा २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी पेरल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून कळत असले तरी, मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास दीड हजार हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मानोरा,मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात येत होती; परंतु लागवडीवर आधारीत भाव न मिळणे, तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणे. आदि कारणांमुळे शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवू लागले. त्यातच या पिकाचा कालावधी अधिक असल्याने रब्बी हंगामातील इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या उलट सोयाबीन हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर होती येणारे असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनवर अधिकाधिक भर देणे सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. आता यंदा सद्यस्थितीत २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यात ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. त्यात वाढ होऊ यंदा हे क्षेत्र १३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर यंदा आतार्यंत ९८० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. कारंजा तालुक्यात मात्र कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, गतवर्षी या तालुक्यात ११ हजार १०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ते प्रमाण आता ५२४७ हेक्टरवर आले आहे. तथापि, जिल्ह्याच्या सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रापैकी २००९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ४६७ हेक्टरने अधिक असल्यामुळे कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.तृणधान्याकडे शेतकऱ्यांची पाठमात्र, शेतकऱ्यांनी ज्वारी , भात,बाजरी व व मका या पिकांकडे पाठ फिरविल्याने यावर्षी केवळ ५ हजार ४१८ हेक्टर आर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी करण्यात आली. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली बिनभरवशाची शेती करताना हमखास उत्पन्न देणा?्या पिकांना प्राधान्य दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.