शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

कृषी विभागाची आकडेवारी: नव्वद टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली!

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे वाढत असल्याने जिल्ह्यातून दरवर्षी कपाशी पेरणीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना यंदा २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी पेरल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून कळत असले तरी, मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास दीड हजार हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मानोरा,मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात येत होती; परंतु लागवडीवर आधारीत भाव न मिळणे, तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणे. आदि कारणांमुळे शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवू लागले. त्यातच या पिकाचा कालावधी अधिक असल्याने रब्बी हंगामातील इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या उलट सोयाबीन हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर होती येणारे असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनवर अधिकाधिक भर देणे सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. आता यंदा सद्यस्थितीत २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यात ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. त्यात वाढ होऊ यंदा हे क्षेत्र १३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर यंदा आतार्यंत ९८० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. कारंजा तालुक्यात मात्र कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, गतवर्षी या तालुक्यात ११ हजार १०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ते प्रमाण आता ५२४७ हेक्टरवर आले आहे. तथापि, जिल्ह्याच्या सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रापैकी २००९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ४६७ हेक्टरने अधिक असल्यामुळे कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.तृणधान्याकडे शेतकऱ्यांची पाठमात्र, शेतकऱ्यांनी ज्वारी , भात,बाजरी व व मका या पिकांकडे पाठ फिरविल्याने यावर्षी केवळ ५ हजार ४१८ हेक्टर आर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी करण्यात आली. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली बिनभरवशाची शेती करताना हमखास उत्पन्न देणा?्या पिकांना प्राधान्य दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.