शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कपाशीच्या पेऱ्यात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:02 IST

कृषी विभागाची आकडेवारी: नव्वद टक्क्यांहून अधिक पेरणी आटोपली!

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे वाढत असल्याने जिल्ह्यातून दरवर्षी कपाशी पेरणीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षीत असताना यंदा २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरच कपाशी पेरल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून कळत असले तरी, मागील वर्षीपेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रात जवळपास दीड हजार हेक्टरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मानोरा,मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी करण्यात येत होती; परंतु लागवडीवर आधारीत भाव न मिळणे, तसेच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणे. आदि कारणांमुळे शेतकरी कपाशीकडे पाठ फिरवू लागले. त्यातच या पिकाचा कालावधी अधिक असल्याने रब्बी हंगामातील इतर पिकांची पेरणी शेतकऱ्यांना शक्य होत नाही. या उलट सोयाबीन हे पीक कमी खर्चाचे आणि लवकर होती येणारे असल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनवर अधिकाधिक भर देणे सुरू केले. परिणामी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कृषी विभागाच्या अंतिम पीक पेरणी अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. आता यंदा सद्यस्थितीत २० हजार ९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मानोरा तालुक्यात सर्वाधिक कपाशीचा पेरा आहे. गतवर्षी मानोरा तालुक्यात ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. त्यात वाढ होऊ यंदा हे क्षेत्र १३ हजार ३०१ हेक्टर झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७६३ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती, तर यंदा आतार्यंत ९८० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. कारंजा तालुक्यात मात्र कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, गतवर्षी या तालुक्यात ११ हजार १०० हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ते प्रमाण आता ५२४७ हेक्टरवर आले आहे. तथापि, जिल्ह्याच्या सरासरी ४७४८० हेक्टर क्षेत्रापैकी २००९७ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत असून मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार ४६७ हेक्टरने अधिक असल्यामुळे कपाशीच्या पेऱ्यात वाढ झाल्याचे दिसत आहे.तृणधान्याकडे शेतकऱ्यांची पाठमात्र, शेतकऱ्यांनी ज्वारी , भात,बाजरी व व मका या पिकांकडे पाठ फिरविल्याने यावर्षी केवळ ५ हजार ४१८ हेक्टर आर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी करण्यात आली. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली बिनभरवशाची शेती करताना हमखास उत्पन्न देणा?्या पिकांना प्राधान्य दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.