शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कोरोना नियंत्रणात, तरी परराज्यातील एकमेव फेरी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील चारही आगारांतून मुख्य मार्गावर ...

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील चारही आगारांतून मुख्य मार्गावर बसफेऱ्या सोडण्यात येत आहेत. परंतु, बसगाड्यांची कमतरता आणि ग्रामीण भागांतून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे निम्म्याहून अधिक नियतेच बंद आहेत. मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम या सर्वच आगारांची स्थिती सारखीच आहे. त्यात वाशिम येथून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे जाणारी बसफेरीही अद्याप सुरू झालेली नाही. परराज्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबतचे आदेश वाशिम आगार प्रमुखांना विभागस्तरावरून मिळालेले नाहीत. त्यामुळे ही बसफेरी गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने या बसचा आधार असलेल्या प्रवाशांची समस्या कायमच आहे.

============

१) जिल्ह्यातील एकूण आगार - ०४

एकूण बसेस - १८६

सध्या सुरू असलेल्या बसेस - १२२

रोज एकूण फेऱ्या - १०१

दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस - ००

२) पुन्हा तोटा वाढला

शासनाने कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर नियंत्रणासाठी गत १५ दिवसांपासून काही निर्बंध नव्याने लागू केले आहेत. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात व्यावसायिक प्रतिष्ठान यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतचीच परवानगी आहे, तर शनिवार, रविवार जीवनावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय, उद्योग बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. त्याचा एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने एसटीचा तोटा पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.

-----------------------

३) दुसऱ्या राज्यासाठी बसच नाही !

वाशिम जिल्ह्यातील चार आगारांपैकी केवळ वाशिम येथील आगारातून परराज्यासाठी एकमेव बस सोडली जाते. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापूर्वी ही बसफेरी नियमित सोडली जात होती. परंतु, गतवर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्याच वेळी वाशिम आगारातून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथे सोडण्यात येणारी बसफेरी बंद करण्यात आली. ती अद्यापही सुरू करण्यात आली नाही.

------------------

४) अनेक मार्गावरील फेऱ्या बंदच

जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू आहेत. काही लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे अंतर मात्र कमी करून सोडण्यात येत आहेत. त्यात औरंगाबाद, पुणे, जळगाव या मार्गावरील एक-दोन बसफेऱ्या बंद आहेत. या मार्गावर प्रवाशांची संख्याही कमी असल्याने आगार व्यवस्थापकांना काही फेऱ्यांचे नियोजन करावे लागत आहे. जिल्ह्यातील चारही आगारांतील काही फेऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी स्थगित कराव्या लागत आहेत.

---------------

५) नागपूर मार्गावर गर्दीच गर्दी

जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावर एसटीच्या बसेस नियमित धावत आहेत. प्रत्येक मार्गावर प्रवाशांचा कमीअधिक प्रतिसाद मिळत असल्याने प्रतिसाद पाहूनच आगार व्यवस्थापकांना फेऱ्यांचे नियोजन करावे लागते. तथापि, जिल्ह्यातील अमरावती, यवतमाळमार्गे नागपूरकडे जाणाऱ्या बसफेऱ्यांना अधिक प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्यांत प्रवाशांची गर्दीच गर्दी दिसत आहे.