शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:42 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने बहुतांश नागरिक ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी आणि मे महिन्यात कडक निर्बंध लागू असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. विविध आजारांचे रुग्णही घरीच बसलेले आहेत. त्यात कोरोनाच्या भीतीने यंदा कडाक्याच्या उन्हातही उष्माघात पळाल्याचे चित्र आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने कुणाचाही बळी घेतल्याची नोंद नाही.

दरवर्षी उन्हाळ्याला सुरुवात झाली की, उष्णाघातापासून संरक्षण कसे करावे? याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाते. एप्रिल ते मे महिन्यादरम्यान तापमान साधारणत: ३९ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्चमध्येच उष्माघात कक्ष तयार करण्यात येतो. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपचार करावेत, याबाबत दरवर्षी सूचना देऊन त्यांना प्रशिक्षणही दिले जाते. मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कडाक्याच्या उन्हातही उष्माघात कक्ष उभारण्यात आल्याचे दिसून येत नाही. कडक निर्बंधांमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने बहुतांश नागरिकदेखील घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताने कुणाचा बळी गेल्याची घटना घडली नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षीदेखील २४ मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे उन्हाळ्यात बहुतांश नागरिक घरातच होते. गतवर्षीदेखील जिल्ह्यात उष्माघाताने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. कोरोनापूर्वी उष्माघातापासून बचाव म्हणून सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली जात होती. गत दीड वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकामी व्यस्त असल्याचे दिसून येते. उष्माघातासंदर्भात यंदा फारशा उपाययोजना दिसून येत नाहीत. दुपारच्या सुमारास सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. कोरोनाच्या भीतीने यंदा मे महिन्यात उन्हाचा चटकाच लागला नाही.

००००००००००००००००

ऊन वाढले तरी...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात साधारणत: ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तापमानात चढउतार दिसून येत आहेत. ऊन लागल्यानंतरही अनेकजण घरगुती उपचारावर भर देत आहेत. ऊन लागल्यास गूळ खाणे, शेळी किंवा गाईचे दूध अंगाला, तळपायांना लावणे, कांद्याचा रस डोक्याला लावणे असे काही घरगुती उपचार केले जातात.

०००००००

उन्हाळा घरातच !

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात संचारबंदी, तर मे महिन्यात कडक निर्बंध लागू आहेत. औषधे, दवाखाना, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कार, आदी अत्यावश्यक कारणांशिवाय सकाळी ११ वाजल्यानंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा घरातच जात असल्याने ऊन लागण्याचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही. सकाळी ११ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.

०००००००००००

उष्माघातापासून बचाव म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विशेष व्यवस्था केली जाते. या वर्षी उष्माघाताचा रुग्ण आला नाही. कडक निर्बंध लागू असल्याने नागरिकदेखील घरातच आहेत. उन्हापासून बचाव म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे आढळून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम