शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

उन्हाळी पिकांना पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या निर्णयात विरोधाभास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST

मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातून वाघी, खंडाळा, शेलगाव, ताकतोडा, रिठद, शिरपूर या रिसोड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जातो. शिवाय हजारो ...

मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातून वाघी, खंडाळा, शेलगाव, ताकतोडा, रिठद, शिरपूर या रिसोड शहराला पिण्याच्या पाणीपुरवठा केला जातो. शिवाय हजारो शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी मिळते. यंदा प्रकल्पात जलसाठा भरपूर दिसत असल्याने यावर्षी उन्हाळी पिके ही शेतकऱ्यांना घेता येईल अशी परिस्थिती होती; परंतु रिठद शाखा अभियंत्यांनी २४ जानेवारी रोजी या प्रकल्पातील जलसाठा रिसोड, शिरपूर, शहरासह रिठद, ताकतोडा, शेलगाव, खंडाळा, वाघी या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केल्याचे पत्र पाणी वापर संस्थांसह ग्रामपंचायतींना दिले. तसेच विनापरवाना पाणी उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला, तर ४ मार्च रोजी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी प्रकल्पात ४४.९४ टक्के इतका जलसाठा असल्याने उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे एका पत्राद्वारे पाणी वापर संस्थांना कळविले. जर मार्च महिन्यामध्ये आडोळ प्रकल्पात पर्याप्त जलसाठा असल्याचे कार्यकारी अभियंता सांगताहेत, तर जानेवारी महिन्यात रिठदच्या शाखा अभियंत्यांनी प्रकल्पातील साठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे पत्र सिंचन संस्थांना का दिले? असा प्रश्न उपस्थित होत असून, लघुपाटबंधारे विभागाच्या दोन अभियंत्यांनी वेगवेगळ्या संदर्भाचे पत्र दिलेल्या शेतकऱ्यांतही संभ्रम निर्माण झाला आहे.

--------------

कोट : पाटबंधारे विभागाच्या रिठद शाखा अभियंत्यांनी दिलेल्या पत्रामुळे अडोळ प्रकल्पाच्या डाव्या कालव्यापासून सातव्या गेटपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली नाही. अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून निर्णय घेता प्रत्यक्ष प्रकल्प पाहून निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा आहे.

-बाळासाहेब वाघ,

शेतकरी, शिरपूर