मालेगाव: तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा अँड. नकुल देशमुख मित्र मंडळाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अँड. नकुल देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. युती शासनाच्यावतीने गाजावाजा करीत राबविण्यात येत असलेला ह्यमेक इन इंडियाह्ण, ह्यइंडिया शायनिंगह्ण हे उपक्रम केवळ उद्योगपतीधाजिर्णे असून, शेतकरी-शेतमजूर वर्गाच्या डोळयात पूर्णत: धूळफेक करणारे आहेत. शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी स्मार्ट सिटी योजनेऐवजी स्मार्ट शेती उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते अँड. नकुल देशमुख यांनी यावेळी केले. धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे, मालेगाव बाजार समिती सभापती गजानन देवळे, माजी पं.स.सदस्य विनोद जोगदंड, माजी जि.प.सदस्य अशोक गवळी, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष इंद्रजित राजुरकर, माजी शहराध्यक्ष भागवत बळी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण देशमुख, निळकंठ कुटे, डॉ.जगदीश घुगे, कृउबासचे संचालक संजय घुगे, माजी पं.स. सदस्य भारत गळे, आझादखॉ पठाण, सुकांडाचे सरपंच जयसिंगराव घुगे, नागरतासचे सरपंच महादेव देवळे, महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष अलका सोनोने, शहर अध्यक्ष रंजना देशमुख यांची उपस्थिती होती.
दुष्काळासंदर्भात काँग्रेसचे धरणे आंदोलन
By admin | Updated: February 16, 2016 01:30 IST