शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

बांधावर जाऊन गोरगरीब विद्यार्थ्यांना पुरविले जातेय संगणकाचे ज्ञान!

By admin | Updated: May 20, 2017 01:39 IST

राजरत्न संस्थेचा उपक्रम : सैराट गाण्यापासून ते तंत्रज्ञान रुचीकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठे आंबे पाडण्यासाठी, बकऱ्या व इतर जनावरे जाण्याकरिता, तर कुठे शेतातील कामे करण्याकरिता फिरत आहेत व पालकसुद्धा सुट्याच्या नावावर त्यांच्याकडून कामे करून घेत आहेत; परंतु याच सुट्याचा शहरी भागातील विद्यार्थी विविध शिबिरातून सदुपयोग करीत असतात. हाच उद्देश समोर ठेवून राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने मालेगाव तालुक्यातील राजाकिन्ही व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपद्वारे संगणकाची माहिती देऊन उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देण्याकरिता बांधावर जाऊन संगणक प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वच बाबतीत ग्रामीण व शहरी भागातील दुही वाढत असून, यामध्ये तंत्रज्ञान व शैक्षणिक माहितीचा अभाव प्रामुख्याने समोर येतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी भर उन्हात दिवसभर कुठेतरी आपला वेळ वाया घालवतात. वेळेचा सदुपयोग व्हावा, याकरिता संस्थेचे प्रतिनिधी शेतशिवार बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासह उपस्थित पालकांना संगणकाचे महत्त्व पटवून देत आहेत. विद्यार्थ्यांना शेतशिवारावर संगणक दिसल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होत असून, आपसुकच काका सैराट पिक्चरचे गाणे दिसते का, अ‍ॅनिमेशन पदवीमध्ये कॅरिअर घडविण्याच्या वाटा प्रतिनिधी सांंगत आहेत. संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने कुठलीही माहिती, करावयाचे कार्य व वेळेची बचत याबाबत विस्तृत माहिती संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, अविनाश नाईक, सुमेध तायडे देत आहेत. अभिनेता अरविंद उचित नकलांच्या माध्यमातून वेळेची बचत करा, संगणकाची कास धराचा संदेश देत आहेत.