शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

बांधकामाधीन सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:37 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाशिम जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या वाशिम जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता एम.के. तायडे, कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, अडाण नदीवर घोटाशिवणी, सत्तरसावंगा आणि बोरव्हा येथे बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्यास सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्याने हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. पैनगंगा नदीवर सहा बॅरेज उभारण्याची मागणी आहे. या नदीवरील कळमगव्हाण प्रकल्प रद्द झाला आहे. त्यासाठी मंजूर असलेले पाणी मसलापेन येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बॅरेजसाठी वापरण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. त्यामुळे पैनगंगा नदीवरील एका बॅरेजचा प्रश्न मार्गी लागेल, उर्वरित ५ बॅरेजच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करावी, अशा सूचना जलसंपदामंत्र्यांनी केल्या.

सोनल मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण योग्य रीतीने होऊन त्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाला सादर करावा. तसेच पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला देण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. याबाबतचा प्रस्तावही तातडीने नियामक मंडळापुढे सादर करावा. मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी प्रकल्पाचे साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा सिंचन वाढविण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना पाटील यांनी या वेळी दिल्या.

.....................

बाॅक्स :

बॅरेजनिर्मितीस मंजुरी मिळावी - ठाकरे

जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे मंगळसा प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्याऐवजी या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून हा प्रकल्प करण्यात यावा. तसेच अडाण नदीवरील तीन बॅरेजच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.