शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

२६ जानेवारीपर्यंत मदत वाटप पूर्ण करा

By admin | Updated: January 13, 2015 01:05 IST

विभागीय आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना.

वाशिम : दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. सदर मदत निधीचे वाटप २६ जानेवारी २0१५ पूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ मदत निधी वाटप आढावा बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.१२ जानेवारी रोजी आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, दिनकर काळे, राजेंद्र पारनाईक, तहसीलदार आशीष बिजवल, जनार्धन विधाते, श्रीकांत उंबरकर, बी.डी. अरखराव, ए. एम. कुंभार, ए. पी. पाटील उपस्थित होते.विभागीय आयुक्त राजूरकर यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सूचना करताना सांगितले की, शेतकर्‍यांचे बँक खाते नंबर मिळवून मदत निधीचे पैसे तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सर्व तहसीलदारांनी प्राधान्याने करावी. प्रत्येक तालुक्याला पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या निधीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्यात.यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी जिल्ह्यात केल्या जात असलेल्या मदत निधी वाटपाची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्याला सध्या ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. हा निधी मागणी केलेल्या एकूण निधीच्या ४0 टक्के इतका असून, या निधीचे सर्व तहसील कार्यालयांना वाटप करण्यात आले आहे. तहसीलला वाटप करण्यात आलेल्या निधीमध्ये वाशिम तहसील कार्यालयाला ११ कोटी, मालेगावला ९ कोटी ५0 लाख, रिसोडला १0 कोटी ५0 लाख, मंगरूळपीरला ८ कोटी ५३ लाख, मानोराला ८ कोटी व कारंजाला १0 कोटी निधी देण्यात आला आहे. तहसील स्तरावर ८0 ते ८५ टक्के शेतकर्‍यांच्या बँक खात्याचे नंबर मिळवण्यात आले असून, उर्वरित बँक खाते नंबर दोन दिवसात प्राप्त होऊन जातील. मदत वाटपातील लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत व तलाठी स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यांवर १३ जानेवारी २0१५ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर १४ जानेवारी २0१५ पासून मदत निधी वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यत जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मदत निधीचे वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिली.