शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:52 IST

वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.

ठळक मुद्देउरलेले अन्न गरजूंना राजरत्न संस्थेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.अनेक परिवार लग्नसमारंभातील शिल्लक राहिलेले अन्न या संस्थेला बोलावून देत असल्याने सर्वांना अन्न बचतीचे महत्त्व पटत असल्याचे चित्र आहे. यासाठी संस्थेचे प्रतिनिधी अन्न बचतीसह लग्नसमारंभ, पाटर्य़ा, वास्तू पूजन, विविध कार्यक्रमातील उरलेले अन्न घेऊन गजरवंत लोकांना नेऊन देत आहेत. संस्थेच्या या कामात लोकसहभाग वाढत असून, इतर जिल्हय़ातसुद्धा याविषयी जनजागृतीचे काम संस्थेने हाती घेतले आहे. जगामध्ये अन्नावाचून मृत्यूचे प्रमाण इतर सर्व मृत्यूच्या तुलनेत जास्त असून, भविष्यात अन्न वाचून राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, याकरिता वेळीच सजग होऊन अन्न बचत करण्याकरिता सर्व स्तरातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न घटत आहे. याकरिता भावी पिढीला अन्नटंचाईला सामोरे न जाण्याकरिता अन्न बचत काळाची गरज असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी पटवून देत आहेत. संस्थेच्या या कार्यात विनोद पट्टेबहादूर , महादेव क्षीरसागर, अरविंद उचित, भगवान ढोले, विकास  पट्टेबहादूर, संतोष हिवराळे, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, गणेश घेवारे, हंसिनी उचित, सोनल तायडे, स्नेहल तायडे, समाधान करडीले, नितीन अढाव, सुमेध तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या प्रतिनिधींच्या जनजागृतीमुळे अनेकांचा लोकसहभाग या उपक्रमात वाढत आहे. 

लग्नसमारंभासह इतर समारंभात होत असलेली अन्नाची नासाडी बघता सर्व मित्र मंडळांनी बसून यावर चर्चा केली व या उपक्रमास सुरुवात केली. गत सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरुवातीला संस्थेचे प्रतिनिधी समारंभ ठिकाणी जाऊन विचारणा करायचे.सद्यस्थितीत अन्न शिल्लक राहिल्यास प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्या जातो, हे या उपक्रमाचे फलित आहे. - भगवान ढोले, प्रतिनिधी, राजरत्न संस्था, वाशिम.