शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

‘येता अन्न दारी, भरे पोट सारी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:52 IST

वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.

ठळक मुद्देउरलेले अन्न गरजूंना राजरत्न संस्थेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना जागेवर देण्याचा उपक्रम  या संस्थेने हाती घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत केल्या जात आहे.अनेक परिवार लग्नसमारंभातील शिल्लक राहिलेले अन्न या संस्थेला बोलावून देत असल्याने सर्वांना अन्न बचतीचे महत्त्व पटत असल्याचे चित्र आहे. यासाठी संस्थेचे प्रतिनिधी अन्न बचतीसह लग्नसमारंभ, पाटर्य़ा, वास्तू पूजन, विविध कार्यक्रमातील उरलेले अन्न घेऊन गजरवंत लोकांना नेऊन देत आहेत. संस्थेच्या या कामात लोकसहभाग वाढत असून, इतर जिल्हय़ातसुद्धा याविषयी जनजागृतीचे काम संस्थेने हाती घेतले आहे. जगामध्ये अन्नावाचून मृत्यूचे प्रमाण इतर सर्व मृत्यूच्या तुलनेत जास्त असून, भविष्यात अन्न वाचून राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, याकरिता वेळीच सजग होऊन अन्न बचत करण्याकरिता सर्व स्तरातून पुढाकार घेणे आवश्यक आहे. शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, वेळी-अवेळी पडणारा पाऊस यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न घटत आहे. याकरिता भावी पिढीला अन्नटंचाईला सामोरे न जाण्याकरिता अन्न बचत काळाची गरज असल्याचे संस्थेचे प्रतिनिधी पटवून देत आहेत. संस्थेच्या या कार्यात विनोद पट्टेबहादूर , महादेव क्षीरसागर, अरविंद उचित, भगवान ढोले, विकास  पट्टेबहादूर, संतोष हिवराळे, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, गणेश घेवारे, हंसिनी उचित, सोनल तायडे, स्नेहल तायडे, समाधान करडीले, नितीन अढाव, सुमेध तायडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या प्रतिनिधींच्या जनजागृतीमुळे अनेकांचा लोकसहभाग या उपक्रमात वाढत आहे. 

लग्नसमारंभासह इतर समारंभात होत असलेली अन्नाची नासाडी बघता सर्व मित्र मंडळांनी बसून यावर चर्चा केली व या उपक्रमास सुरुवात केली. गत सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरुवातीला संस्थेचे प्रतिनिधी समारंभ ठिकाणी जाऊन विचारणा करायचे.सद्यस्थितीत अन्न शिल्लक राहिल्यास प्रतिनिधींना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्या जातो, हे या उपक्रमाचे फलित आहे. - भगवान ढोले, प्रतिनिधी, राजरत्न संस्था, वाशिम.