शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

थंडीचा कडाका वाढला; साथरोग बळावले!

By admin | Updated: January 26, 2016 02:23 IST

वातावरणातील बदलाचा परिणाम; रुग्णालयात रुग्णांची गर्दी.

वाशिम: थंडीचा कडाका आणि वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप आदी साथरोगाने डोके वर काढले असून, जिल्हय़ातील नागरिक हैराण झाले आहेत. उपचारार्थ शेकडो रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल होत आहेत. गत चार दिवसांपासून वातावरणात अचानक गारवा आल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. २0१५ या वर्षात पावसाळ्यात फारसा पाऊस झाला नसल्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया आदी आजारांची लागण झाली नाही; मात्र गत चार-पाच दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, विषमज्वर आदी आजारांना नागरिक बळी पडत असल्याचे दिसून येते. हिमवृष्टीनंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्‍या शीत वार्‍याने पुन्हा एकदा जोर पकडल्याने वाशिमसह अख्खे राज्य कुडकुडले आहे. पहाटेपासूनच थंडी जाणवत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर अधिकच थंडी वाढते. पाच दिवसांपूर्वी रात्री जिल्ह्याचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तीन दिवसांपासून तापमान १३ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले. वाढत्या थंडीमुळे जिल्हावासी वैतागले आहेत. थंडीपासून बचाव म्हणून स्वेटर, ऊबदार कपडे पुन्हा बाहेर निघाले असल्याचे दिसून येते. कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, प्लेटलेट कमी होणे आदी प्रकाराच्या आजाराने डोके वर काढले. बालके आणि वयोवृद्ध विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येते. विशेषत: लहान बालकांना ही थंडी अधिकच असह्य ठरत आहे. बालकांची रोगप्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे आक्रमण लवकर होते. बालकांप्रमाणेच वृद्धांचीही हीच अवस्था आहे. उतारवयामुळे त्यांनादेखील थंडी असह्य होते. सर्दी, खोकला, डोकेदुखीसारखे आजार जडत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: दररोज ३00 ते ४00 नागरिक विविध आजारांच्या तपासणीसाठी येत आहेत. खासगी दवाखान्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येते.