शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरातील सिमेंट रस्ते बनले "वाहनतळ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात ...

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात रस्त्यांवरून वाहने चालवितानाच काय, तर चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. वाहने एकमेकांना धडकण्याचे प्रकार यामुळे वाढले असून, यातून लहान - मोठे अपघात दरदिवशी घडत आहेत. वाहनतळाचे योग्य नियोजन नसणे, तसेच नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे नियोजन करताना फूटपाथसाठी जागा न सोडणे आदी बाबींमुळे हा प्रकार घडत आहे. त्यात ज्या ठिकाणी फूटपाथसाठी जागा सोडली. त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला. त्यांच्यावरही प्रशासन कारवाई करीत नाही. परिणामी रस्तेच वाहनतळ बनले आहेत.

००००००००००००००

बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीच गर्दी

शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजुला वाहने ठेवली जात आहेत. त्यात रस्त्यालगत फेरीवाले उभे राहात असल्यामुळे रस्ताच दिसेनासा होत आहे. बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने फेरीवाले रस्त्यावर उभे राहतात. पालिका अतिक्रमण विभाग, वाहतूक विभाग, पोलिसांची कारवाई सुरू असली, की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात. कारवाई आटोपली की, पुन्हा रस्त्यांवर येतात. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

160921\1644-img-20210916-wa0009.jpg

मंगरुळपीर येथील सिमेंट रस्ते बनले 'वाहनतळ'

मंगरुळपीर ता १६/(ता प्र) गुळगुळीत सिमेंट रस्ते हे रहदारीसाठी आहेत की 'वाहनतळ ' म्हणून त्यांचा वापर करण्यासाठी ते तयार करण्यात आले ते शहरातील मुख्य रस्त्यांची स्थिती बघून कळतच नाही , इतपत नियोजनाचे तीन - तेरा वाजले आहेत . एकूणच काय तर पार्किंगबाबत बेताल कारभार सुरू आहे .

सध्या शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे . अशात रस्त्यांवरून वाहने घेऊन जातानाच काय , चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते .वाहने एकमेकांना धडकणे , धडक बसणे , लहान - मोठे अपघात तर ठरलेलेच आहे . याला कारण वाहनतळाबाबत अचूक व योग्य नियोजन नसणे हेच आहे . नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे नियोजन करताना फुटपाथसाठी जागाच सोडली नाही . ज्या ठिकाणी फुटपाथसाठी जागा सोडली , त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला . त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही . परिणामी रस्ते वाहनतळ बनले .यातच मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजूला वाहने ठेवली जात असल्यामुळे लहान झालेल्या रस्त्यांचा आकार फेरीवाले उभे राहत असल्यामुळे आणखीनच संकुचित झाला आहे . त्यामुळे रस्त्यावरून केवळ पायीच चालायचे काय , असा प्रश्न पडतो . फेरीवाले बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने रस्त्यावर उभे राहतात . वस्तू खरेदी करणारे त्यांच्या गाड्याही तेथेच उभ्या करतात . त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होतो .पालिका अतिक्रमण विभाग , वाहतूक विभाग , पोलिसांची कारवाई सुरू असली की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात . कारवाई आटोपली की , मग पुन्हा रस्त्यांवर येतात.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.