शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मंगरुळपीर शहरातील सिमेंट रस्ते बनले "वाहनतळ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात ...

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात रस्त्यांवरून वाहने चालवितानाच काय, तर चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. वाहने एकमेकांना धडकण्याचे प्रकार यामुळे वाढले असून, यातून लहान - मोठे अपघात दरदिवशी घडत आहेत. वाहनतळाचे योग्य नियोजन नसणे, तसेच नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे नियोजन करताना फूटपाथसाठी जागा न सोडणे आदी बाबींमुळे हा प्रकार घडत आहे. त्यात ज्या ठिकाणी फूटपाथसाठी जागा सोडली. त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला. त्यांच्यावरही प्रशासन कारवाई करीत नाही. परिणामी रस्तेच वाहनतळ बनले आहेत.

००००००००००००००

बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीच गर्दी

शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजुला वाहने ठेवली जात आहेत. त्यात रस्त्यालगत फेरीवाले उभे राहात असल्यामुळे रस्ताच दिसेनासा होत आहे. बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने फेरीवाले रस्त्यावर उभे राहतात. पालिका अतिक्रमण विभाग, वाहतूक विभाग, पोलिसांची कारवाई सुरू असली, की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात. कारवाई आटोपली की, पुन्हा रस्त्यांवर येतात. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

160921\1644-img-20210916-wa0009.jpg

मंगरुळपीर येथील सिमेंट रस्ते बनले 'वाहनतळ'

मंगरुळपीर ता १६/(ता प्र) गुळगुळीत सिमेंट रस्ते हे रहदारीसाठी आहेत की 'वाहनतळ ' म्हणून त्यांचा वापर करण्यासाठी ते तयार करण्यात आले ते शहरातील मुख्य रस्त्यांची स्थिती बघून कळतच नाही , इतपत नियोजनाचे तीन - तेरा वाजले आहेत . एकूणच काय तर पार्किंगबाबत बेताल कारभार सुरू आहे .

सध्या शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे . अशात रस्त्यांवरून वाहने घेऊन जातानाच काय , चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते .वाहने एकमेकांना धडकणे , धडक बसणे , लहान - मोठे अपघात तर ठरलेलेच आहे . याला कारण वाहनतळाबाबत अचूक व योग्य नियोजन नसणे हेच आहे . नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे नियोजन करताना फुटपाथसाठी जागाच सोडली नाही . ज्या ठिकाणी फुटपाथसाठी जागा सोडली , त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला . त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही . परिणामी रस्ते वाहनतळ बनले .यातच मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजूला वाहने ठेवली जात असल्यामुळे लहान झालेल्या रस्त्यांचा आकार फेरीवाले उभे राहत असल्यामुळे आणखीनच संकुचित झाला आहे . त्यामुळे रस्त्यावरून केवळ पायीच चालायचे काय , असा प्रश्न पडतो . फेरीवाले बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने रस्त्यावर उभे राहतात . वस्तू खरेदी करणारे त्यांच्या गाड्याही तेथेच उभ्या करतात . त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होतो .पालिका अतिक्रमण विभाग , वाहतूक विभाग , पोलिसांची कारवाई सुरू असली की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात . कारवाई आटोपली की , मग पुन्हा रस्त्यांवर येतात.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.