शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

मंगरुळपीर शहरातील सिमेंट रस्ते बनले "वाहनतळ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:49 IST

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात ...

सध्या मंगरुळपीर शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे. अशात रस्त्यांवरून वाहने चालवितानाच काय, तर चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते. वाहने एकमेकांना धडकण्याचे प्रकार यामुळे वाढले असून, यातून लहान - मोठे अपघात दरदिवशी घडत आहेत. वाहनतळाचे योग्य नियोजन नसणे, तसेच नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे नियोजन करताना फूटपाथसाठी जागा न सोडणे आदी बाबींमुळे हा प्रकार घडत आहे. त्यात ज्या ठिकाणी फूटपाथसाठी जागा सोडली. त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला. त्यांच्यावरही प्रशासन कारवाई करीत नाही. परिणामी रस्तेच वाहनतळ बनले आहेत.

००००००००००००००

बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीच गर्दी

शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजुला वाहने ठेवली जात आहेत. त्यात रस्त्यालगत फेरीवाले उभे राहात असल्यामुळे रस्ताच दिसेनासा होत आहे. बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने फेरीवाले रस्त्यावर उभे राहतात. पालिका अतिक्रमण विभाग, वाहतूक विभाग, पोलिसांची कारवाई सुरू असली, की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात. कारवाई आटोपली की, पुन्हा रस्त्यांवर येतात. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

160921\1644-img-20210916-wa0009.jpg

मंगरुळपीर येथील सिमेंट रस्ते बनले 'वाहनतळ'

मंगरुळपीर ता १६/(ता प्र) गुळगुळीत सिमेंट रस्ते हे रहदारीसाठी आहेत की 'वाहनतळ ' म्हणून त्यांचा वापर करण्यासाठी ते तयार करण्यात आले ते शहरातील मुख्य रस्त्यांची स्थिती बघून कळतच नाही , इतपत नियोजनाचे तीन - तेरा वाजले आहेत . एकूणच काय तर पार्किंगबाबत बेताल कारभार सुरू आहे .

सध्या शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून सण - उत्सवांमुळे रस्त्यांवरील गर्दीही वाढली आहे . अशात रस्त्यांवरून वाहने घेऊन जातानाच काय , चालतानाही तारेवरची कसरत करावी लागते .वाहने एकमेकांना धडकणे , धडक बसणे , लहान - मोठे अपघात तर ठरलेलेच आहे . याला कारण वाहनतळाबाबत अचूक व योग्य नियोजन नसणे हेच आहे . नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे नियोजन करताना फुटपाथसाठी जागाच सोडली नाही . ज्या ठिकाणी फुटपाथसाठी जागा सोडली , त्या जागेवर दुकानदारांनी ताबा मिळवला . त्यांच्यावर कोणीही कारवाई करीत नाही . परिणामी रस्ते वाहनतळ बनले .यातच मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये दोन्ही बाजूला वाहने ठेवली जात असल्यामुळे लहान झालेल्या रस्त्यांचा आकार फेरीवाले उभे राहत असल्यामुळे आणखीनच संकुचित झाला आहे . त्यामुळे रस्त्यावरून केवळ पायीच चालायचे काय , असा प्रश्न पडतो . फेरीवाले बहुतांश ठिकाणी फुटपाथ नसल्याने रस्त्यावर उभे राहतात . वस्तू खरेदी करणारे त्यांच्या गाड्याही तेथेच उभ्या करतात . त्यामुळे वाहतुकीस खोळंबा होतो .पालिका अतिक्रमण विभाग , वाहतूक विभाग , पोलिसांची कारवाई सुरू असली की हे फेरीवाले आतील गल्लीबोळात फिरतात . कारवाई आटोपली की , मग पुन्हा रस्त्यांवर येतात.त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.