शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. तुम्ही गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. ...

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. गावाच्या वेशीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तीला गावात येऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार आता मात्र भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारू लागल्याने बाहेरगावी असणारी ही मंडळी चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.

गावाकडे रोजगार निर्मिती होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात रोजगार हरवल्यामुळे महानगरांमध्ये हतबल झाली होती. त्यामुळे त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळण्याच्या मन:स्थितीत असतानाच कोरोना लॉकडाऊनच्या काळात या बाहेरगावाकडील मंडळींना स्वतःच्या गावातच येण्यापासून रोखण्यात आले होते. यामध्ये गावातील पुढारी मंडळी प्रामुख्याने समोर होती. त्यांच्या गावात येण्यावर अनेक मंडळींनी नाराजीसुद्धा दर्शविली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोध करणारी गावातील हीच मंडळी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने दादा, भाऊ, ताई, अक्का तुम्ही गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारीत गावाकडे येण्याची विनवणी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे या गावपुढाऱ्यांना आता शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे. त्यामुळे महानगरीत स्थिरावलेल्या या मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.