शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. तुम्ही गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. ...

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. गावाच्या वेशीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तीला गावात येऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार आता मात्र भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारू लागल्याने बाहेरगावी असणारी ही मंडळी चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.

गावाकडे रोजगार निर्मिती होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात रोजगार हरवल्यामुळे महानगरांमध्ये हतबल झाली होती. त्यामुळे त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळण्याच्या मन:स्थितीत असतानाच कोरोना लॉकडाऊनच्या काळात या बाहेरगावाकडील मंडळींना स्वतःच्या गावातच येण्यापासून रोखण्यात आले होते. यामध्ये गावातील पुढारी मंडळी प्रामुख्याने समोर होती. त्यांच्या गावात येण्यावर अनेक मंडळींनी नाराजीसुद्धा दर्शविली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोध करणारी गावातील हीच मंडळी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने दादा, भाऊ, ताई, अक्का तुम्ही गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारीत गावाकडे येण्याची विनवणी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे या गावपुढाऱ्यांना आता शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे. त्यामुळे महानगरीत स्थिरावलेल्या या मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.