शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. तुम्ही गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. ...

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. गावाच्या वेशीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तीला गावात येऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार आता मात्र भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारू लागल्याने बाहेरगावी असणारी ही मंडळी चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.

गावाकडे रोजगार निर्मिती होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात रोजगार हरवल्यामुळे महानगरांमध्ये हतबल झाली होती. त्यामुळे त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळण्याच्या मन:स्थितीत असतानाच कोरोना लॉकडाऊनच्या काळात या बाहेरगावाकडील मंडळींना स्वतःच्या गावातच येण्यापासून रोखण्यात आले होते. यामध्ये गावातील पुढारी मंडळी प्रामुख्याने समोर होती. त्यांच्या गावात येण्यावर अनेक मंडळींनी नाराजीसुद्धा दर्शविली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोध करणारी गावातील हीच मंडळी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने दादा, भाऊ, ताई, अक्का तुम्ही गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारीत गावाकडे येण्याची विनवणी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे या गावपुढाऱ्यांना आता शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे. त्यामुळे महानगरीत स्थिरावलेल्या या मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.