शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. तुम्ही गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. ...

वाशिम : रोजगार निर्मितीकरिता महानगरीकडे वळलेली पावले कोरोना लॉकडाऊनच्या काळात गावाकडे परतू पाहत असताना त्यांना गावबंदी करण्यात आली होती. गावाच्या वेशीवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तीला गावात येऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान करावे, यासाठी उमेदवार आता मात्र भाऊ.. दादा.. ताई.. अक्का.. गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारू लागल्याने बाहेरगावी असणारी ही मंडळी चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे.

गावाकडे रोजगार निर्मिती होत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेतली. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात रोजगार हरवल्यामुळे महानगरांमध्ये हतबल झाली होती. त्यामुळे त्यांची पावले आपसूकच गावाकडे वळण्याच्या मन:स्थितीत असतानाच कोरोना लॉकडाऊनच्या काळात या बाहेरगावाकडील मंडळींना स्वतःच्या गावातच येण्यापासून रोखण्यात आले होते. यामध्ये गावातील पुढारी मंडळी प्रामुख्याने समोर होती. त्यांच्या गावात येण्यावर अनेक मंडळींनी नाराजीसुद्धा दर्शविली होती. कोरोना लॉकडाऊनच्या काळात विरोध करणारी गावातील हीच मंडळी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने दादा, भाऊ, ताई, अक्का तुम्ही गावाकडे कधी येणार, असा प्रश्न विचारीत गावाकडे येण्याची विनवणी करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे या गावपुढाऱ्यांना आता शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे. त्यामुळे महानगरीत स्थिरावलेल्या या मतदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.