शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जड वाहनांमुळे हादरतोय काटेपूर्णा नदीवरील पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गेट क्रमांक १०२ औरंगाबाद-नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवर असलेला पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत ...

मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गेट क्रमांक १०२ औरंगाबाद-नागपूर सुपर हायवेवरील काटेपूर्णा नदीवर असलेला पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची दयनीय अवस्था झाली असून जड वाहने धावत असताना पूल हादरत असल्याचा अनुभव अनेकजण बोलून दाखवत आहेत. पुलावर खड्डेच खड्डे पडले असून १४ जुलै रोजी वाशिमहून जऊळका येथे वाहनाने जात असलेला रेल्वे कर्मचारी खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याची घटना घडली.

काटेपूर्णा नदीवरील याच पुलावरून काही महिन्यांपूर्वी ट्रक पाण्यात पडला होता. लहान मुलगाही पाण्यात पडला होता. त्याचा मृतदेह चार ते पाच दिवस सापडला नव्हता. काटेपूर्णा नदीवर लघुसिंचन विभागाच्या अखत्यारित येणारा चाका सिंचन प्रकल्प आहे. पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असून त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीही वाढ होणार आहे. या पुलाचे काम करण्याची आवश्यकता असून हा पूल रस्ते विकास महामंडळाकडे असूनसुद्धा हे काम लघुसिंचन विभाग करेल, असा वाद आहे. तथापि, प्रशासनाने हा प्रश्न सामोपचाराने निकाली काढून पुलाची व पुलावरील रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

......................

१९८४ मध्ये वाहून गेला होता पूल

जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीवरील पूल यापूर्वी १९८४ मध्ये पुराच्या पाण्याने वाहून गेला होता. त्यानंतर नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्याला आजमितीस ३७ वर्षे होत आहेत. सध्या पुलाची दयनीय अवस्था झाली असून पुलावरील रस्ताही नादुरूस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होण्यासोबतच अपघातांची शक्यताही बळावली आहे.

140721\screenshot_2021-07-14-17-19-25-003_com.whatsapp.jpg

पडलेलं वाहन